एक देश एक कायदा! मोदींनी पुन्हा दिले समान नागरी कायदा लागू करण्याचे संकेत

    31-Oct-2024
Total Views | 116

modi ucc
 
गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने भारताच्या एकतेवर आणि अखंडतेवर जोर देत भारताच्या या गुणविशेषांचा गौरव केला. भारत देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतीला वंदन पंतप्रधान मोदी यांनी वंदन केले. त्याच बरोबर, भारत देश एक देश एक निवडणूक या संकल्पनेकडे वाटचाल करीत आहे जेणेकरून, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका एकत्र घेता येतील.

याच सोबत, मोदी म्हणाले की भारत आता एका समान नागरी कायद्याकडे वाटचाल करत आहे. उत्तराखंडमधील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या राज्य विधानसभेत एकसमान नागरी संहिता पास केली. ऐतिहासिकदृष्ट्या, काही विशिष्ठ मतदारांच्या प्रतिक्रियेच्या भीतीने एकामागून एक आलेल्या सरकारांनी या धर्म-आधारित कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचे टाळले होते.

सरदार पटेलांचा वारसा जतन करूया
मागच्या दशकभरातील वाटचालीवर भाष्य करताना मोदी म्हणाले की, " राष्ट्रीय एकात्मतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सरदार पटेल यांचा भारदास्त आवाज, स्टॅच्यू ऑफ युनिटी जवळील हा भव्य असा कार्यक्रम, त्यात होणारे सादरीकरण हे सगळं म्हणजे भारताचेच दर्शन आहे. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या प्रमाणेच एकता दिवस सुद्धा दिमाखात साजरा केला गेला पाहिजे. आज सरदार पटेल यांच्या १५० व्या जयंतीची सुरूवात होत आहे. आपण हा उत्सव पुढची २ वर्ष साजरा करणार आहोत. त्यांत्या असामान्य कारकीर्दीला वाहिलेली ही श्रद्धांजली असेल. ज्या वेळेस भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा काही जणांना वाटत होते की देशाचे तुकडे पडतील परंतु सरदार पटेल यांनी मात्र तसे होऊ दिले नाही."


 
अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121