मुंबईकर सरफराजने आणला न्यूझीलंडच्या नाकात दम, मिळालेल्या संधीचं केलं सोनं

    21-Oct-2024
Total Views | 44

Sarfaraj Khan
 
बंगळूरु : टीम इंडिया विरूद्ध न्यूझीलंडच्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा दि: २० ऑक्टोबर रोजी बंगळूरु येथे दारूण पराभव झाला. मात्र या कसोटी सामन्यांमध्ये काही खेळाडूंनी केलेल्या खेळीमुळे अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे. त्यात टीम इंडियाचा नवखा खेळाडू उत्कृष्ठ फलंदाज सरफराज खानने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याने अनेक क्रिकेट रसिकांची मने जिंकूण घेतली आहेत. एम चिन्नास्वामी स्टेडियम खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीतील चौथ्या दिवशी सरफराज खानने आंतरराष्ट्रीय शतक झळकवत तिसऱ्या दिवशी ७० धावांहून अधिक धावसंख्या करत एकतर्फी खेळ दाखवला.
 
देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण करून सरफराज खानने चांगल्या धावा केल्या. मात्र त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. त्यानंतर त्याने स्वत:वर काम करणे सुरुच ठेवले. त्याने शतकांमागून शतक ठोकण्याचा विक्रम केला. अखेऱ १५ फेब्रुवारी राजकोट येथे इंग्लंडविरूद्ध पदार्पण करण्याची संधी सरफराजकडे चालून आली होती. त्यावेळी त्याने ६२ धावा केल्यानंतर त्याने शतकाकडे वाटचाल केली होती, मात्र रविंद्र जडेजा आणि सरफराज यांच्यात धाव घेत असताना गोंधळ निर्माण झाल्याने सरफराज बाद झाला.
 
सरफराज खानचे पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच थोडक्यात शतक हुकले होते. मात्र त्यानंतर त्याने शतक पूर्ण केले होते. या शतकाचा आनंद सरफराजच्या गगनात मावणारा नव्हता. त्याने मैदानात धावून शतक पूर्ण केलेला क्षण बेधुंदपणे साजरा केला होता.
 
दरम्यान नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे. न्यूझीलंडने भारताच्या भूमीवर देखणी कामगिरी केली आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावांत त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र ऐनवेळी न्यूझीलंड संघाला थांबवणे हे टीम इंडियाच्या अवाक्याबाहेर होते. भारताच्या पहिल्या डावांत प्रत्युत्तर देत असताना पाहुण्या संघाने रचिन रवींद्रने शतक केले आणि टीम साऊदीच्या जोरावर पहिल्या डावांत भारतीय फलंदाज आपल्या मूळ फॉर्ममध्ये आले होते. तिसऱ्या दिवसांत २३१ धावा आणि ३ गडी बाद असा भारताचा धावफलक होता. त्यानंतर टीम इंडियाने एका गडी गमावून ४०८ धावा केल्या होत्या.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
काँग्रेस संबंधित कंपन्यांवर ईडीची टांगती तलवार, कार्यवाहीस लवकरच सुरूवात होणार

काँग्रेस संबंधित कंपन्यांवर ईडीची टांगती तलवार, कार्यवाहीस लवकरच सुरूवात होणार

ED काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्याशी संबंधित असणार्‍या कंपनीवर सक्तवसुली संचालनालयाने शनिवारी कार्यवाहीस सुरूवात केली. या मालमत्तेत दिल्ली, मुंबई आणि लखनऊमधील प्रमुख असणाऱ्या मालमत्तांचा समावेश आहे. काँग्रेसच्या संबंधित असणाऱ्या कंपनीशी नॅशनल हेराल्ड प्रकरणात असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड कंपनीकडे ६०० कोटी रुपयांहून अधिक किंमतीची मालमत्ता असल्याचे बोलले जात आहे. त्यापैकी देशाची राजधानी दिल्लीतून बहादूर शाह जाफर मार्गावरील प्रतिष्ठित हेराल्ड हाऊस आहे...

अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Bangladeshi राजस्थानातील अजमेर पोलिसांनी २३ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी घुसखोरी व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या आहेत. व्हिसाशिवाय अवैधपणे बांगलादेशी व्यक्तीने भारतात घुसखोरी केली आणि त्याला तब्बल २३ वर्षानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित अवैधपणे घुसखोरी करणाऱ्याचे नाव हे मोहम्मद शाहिद असून त्याचे वय वर्षे हे ४० आहे. तो अजमेरमधील अंदर कोट परिसरात अवैधपणे वास्तव्य करत होता. एटीएएफने एकूण अकरा कारवायांमध्ये एकूण २१ घुसखोरांना पकडले आहे. दरम्यान, आता दर्गा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121