किवी गोलंदाजांसमोर टीम इंडिया नेस्तानाबूत; पहिला डाव अवघ्या ४६ धावांवर आटोपला

    17-Oct-2024
Total Views | 34
indian-players-did-not-work-in-bengaluru-collapsed


मुंबई :   
भारत विरुध्द न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळविण्यात येत आहे. एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरु येथे मालिकेतील पहिला सामना सुरू असून पहिल्या डावात टीम इंडियाने घरच्या मैदानावर आजवरची सर्वात कमी धावसंख्या ४६ केली आहे. पहिला दिवस पावसामुळे रद्द केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या खेळात अवघ्या ४६ धावांवर टीम इंडिया डाव आटोपला. टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा यष्टीरक्षक रिषभ पंत (२० धावा) करता आल्या.


हे वाचलंत का? -    सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड होणार निवृत्त, कोणाच्या हाती असणार धुरा?


दरम्यान, कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर डावाची सुरूवात करताना पहिला विकेट ९ धावांवर रोहित (२ धावा) गेल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे पहिल्या डावात टीम इंडियाचे पाच फलंदाज एकही धावा न करता बाद झाले आहेत. न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना मॅट हेन्रीने सर्वाधिक(१५ धावा ५ विकेट) घेतल्या. तर विलियम ओर्रूकने ४ विकेट्स घेत टीम इंडियाला धक्का दिला.


घरच्या मैदानावरील आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या

टीम इंडिया अवघ्या ४६ धावांत ऑलआऊट झाली. घरच्या मैदानावरील कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाची आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे. याआधी १९७९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघाने केवळ ७५ धावा करत गारद झाला होता. कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाची ही तिसरी सर्वात कमी धावसंख्या असून २०२० मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या ३६ धावांत गारद झाला होता त्यानंतर आता टीम इंडिया घरच्या मैदानावर ५० धावांचा टप्पाही पार करू शकली नाही.
 


 
अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121