लाखों वाहनधारकांना टोलमाफीच्या निर्णयाचा लाभ होणार; आमदार संजय केळकर यांची प्रतिक्रिया

    14-Oct-2024
Total Views | 65
 
Sanjay Kelkar
 
मुंबई : लाखों वाहनधारकांना टोलमाफीच्या निर्णयाचा लाभ होणार, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार संजय केळकर यांनी दिली आहे. राज्य सरकारने मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी देण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी रात्री १२ वाजतापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
 
हे वाचलंत का? -  महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाला उद्योगपती रतन टाटांचे नाव! मंत्री मंगल प्रभात लोढांची माहिती
 
याबद्दल बोलताना संजय केळकर म्हणाले की, "मुंबईकडे जाणाऱ्या छोट्या आणि हलक्या वाहनांना पुर्णपणे टोलमुक्त करण्यात आले आहे. लाखों वाहनधारकांना याचा मोठा लाभ होणार आहे. गेली ९ वर्षे आम्ही सातत्याने टोलमुक्तीची मागणी करत आहोत. त्यासाठी विधिमंडळात, विधिमंडळाच्या बाहेर आंदोलने आणि उपोषण करत आलोत. आज राज्य सरकारने या वाहनधारकांना फार मोठा दिलासा दिला आहे," असे ते म्हणाले. तसेच त्यांनी या निर्णयासाठी महायूती सरकारचे आभार मानले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
ऑपरेशन सिंदूरनंतर आता

ऑपरेशन सिंदूरनंतर आता 'ऑपरेशन पुशबॅक'ने उडवली बांगलादेशची झोप!

भारताने ऑपरेशन सिंदूर मोहिम राबवत पाकिस्तानातील दहशतवादास चांगलाच धडा शिकवला. या अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अनेक तळही उध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने बांगलादेशी घुसखोरांविरोधात ऑपरेशन पुशबॅक सुरु केले आहे. बांगलादेशी-रोहिंग्यांच्या देशातील वाढत्या प्रमाणावरून उचलण्यात आलेले हे पाऊल आहे. या कारवाईअंतर्गत, तात्काळ कारवाई करून, घुसखोरांना निवडकपणे त्यांच्या देशात परत पाठवले जात आहे. आतापर्यंत सुमारे एक हजारहून अधिक बांगलादेशींना परत पाठवण्यात आले आहे. इस्लामिक कट्टरपंथींना मात्र या कारवाईमुळे ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121