सायबर सुरक्षेत महाराष्ट्र देशात सर्वात पुढे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

"महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट"चे उद्धाटन संपन्न

    11-Oct-2024
Total Views | 39
 
Fadanvis
 
नवी मुंबई : सायबर सुरक्षेत महाराष्ट्र देशात सर्वात पुढे गेला आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. शुक्रवारी, नवी मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी प्रोजेक्टचे पार पडले. यावेळी ते बोलत होते.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "हे देशातील सर्वात आधुनिक सायबर सिक्युरिटी सेंटर आहे. देशातील सर्वात आधुनिक तंत्रज्ञान इथे एकत्रित करण्यात आले आहे. कुठल्याही प्रकारचे सायबर अटॅक आणि फसवणूक यामाध्यमातून थांबवता येतील आणि अपराधींना शिक्षा देता येईल. या प्रकल्पामुळे महाराष्ट्र सायबर सिक्युरिटीमध्ये देशात सर्वात पुढे गेला आहे. कुठल्याही प्रकारचे सायबर गुन्हे थांबवण्यासाठी या सेंटरचा फायदा होणार आहे."
 
हे वाचलंत का? -  संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यभरात 'घर घर संविधान' अभियान राबवणार!
 
"यावेळी १४४०७ हा एक नंबरसुद्धा लॉन्च करण्यात आला आहे. या नंबरद्वारे सायबर गुन्हेगारी संदर्भात एखाद्या व्यक्तीला सगळी मदत करता येणार आहे. हा नंबर सर्व प्रकारच्या सायबर गुन्ह्यांकरिता एक उपाय म्हणून पुढे येत आहे," असेही उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

Tahawwur Rana काँग्रेस नेतृत्वाखालील असणाऱ्या युपीए सरकारला सत्तेतून बाहेर जाऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विरोधक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए सरकारच्या प्रत्येक कामाचे श्रेय हे स्वत:घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून युपीए सरकारच्या शासनकाळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संबंधित दहशतवाद्याचे प्रत्यार्पित करण्यात आले. मात्र, याचे सर्व श्रेय हे काँग्रेस घेत असल्याच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121