मला ईडीची कुठलीही नोटीस निघाली नाही : रोहित पवार

    06-Jan-2024
Total Views |

Rohit Pawar


मुंबई :
बारामती ॲग्रो गैरव्यवहार प्रकरणी शुक्रवारी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांच्या सहा ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली. याबद्दल आता रोहित पवारांनी पहिलीच प्रतिक्रीया दिली आहे. याप्रकरणी आपल्या नावाने कुठलीही नोटीस निघाली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. शनिवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
रोहित पवार म्हणाले की, "पवार साहेबांच्या नावाने नोटीस निघाली होती. माझ्या नावाने कुठलीही नोटीस निघाली नाही. माझ्या अधिकाऱ्यांनी ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलीत. मला जेव्हा नोटीस येईल तेव्हा मी तिथे जाऊन जे खरं आहे ते सांगेन. पण यावेळी मी विचार किंवा बाजू बदलेन असं काहीही होणार नाही. माझे विचार आणि लहानपणापासूनची शिकवण नक्कीच याबद्दलची दक्षता घेईल."
 
ते पुढे म्हणाले की, "आम्ही ईडीला सगळे कागदपत्रे दिलेली आहेत. मी खरंच चुक केली असती तर भारताबाहेर असताना मी परत आलो नसतो. तसेच चुक केली असती तर मी अजितदादांबरोबर जाऊन बसलो असतो. आमच्यासाठी विचार आणि महाराष्ट्र धर्म महत्त्वाचा आहे. आम्ही आमचा लढा तसाच सुरु ठेवू. ईडी असो किंवा कुठलाही विभाग असो त्यांना जे काही सहकार्य लागेल ते आम्ही करत राहू," असेही ते म्हणाले.



अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121