लॅण्ड जिहाद करणाऱ्यांसाठी महाराष्ट्रात 'बुलडोझर देवा' पॅटर्न : नितेश राणे

    24-Jan-2024
Total Views | 59

Rane


मुंबई :
योगीजींनी ज्याप्रमाणे बुलडोझर पॅटर्न आणलं तसाच आता महाराष्ट्रात 'बुलडोझर देवा' नावाचा पॅटर्न सुरु झालेला आहे, अशी माहिती भाजप आमदार नितेश राणेंनी दिली आहे. रविवारी रात्री मीरा रोडच्या नया नगर परिसरात श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यास सुरुवात झाली.
 
नितेश राणे म्हणाले की, "नया नगरमध्ये झालेल्या बुलडोझरच्या कारवाईमुळे महाराष्ट्रातही बुलडोझर पॅटर्न येऊ शकतं, असा विश्वास हिंदु समाजात आला आहे. यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मनापासून आभार मानतो. ज्याप्रमाणे योगीजींनी बुलडोझर पॅटर्न आणलं तसाच आता महाराष्ट्रात 'बुलडोझर देवा' नावाचा पॅटर्न सुरु झालेला आहे. जिथे जिथे हे जिहादी लॅण्ड जिहादच्या नावाने अतिक्रमण करतील तिथे तिथे बुलडोझर देवा चालताना दिसेल," असे ते म्हणाले.
 
रावणमुक्त महाराष्ट्र करण्याची वेळ आली आहे!
 
श्रीराम हे भाजपमुक्त करावे लागतील, असे वक्तव्य मंगळवारी उद्धव ठाकरेंनी केले होते. यावरून नितेश राणेंनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, "श्रीराममुक्त भाजप हे कोण बोलतंय जो दहा तोंडी रावणासारखा आहे. दहा तोंडी रावणमुक्त महाराष्ट्र करण्याची वेळ आता आली आहे. महाराष्ट्रातील जनता २०२४ ला उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या दोघांनाही त्यांची लायकी दाखवण्याचं काम करेल, असा माझा विश्वास आहे," असेही ते म्हणाले.
 
रोहित पवारांच्या ईडी चौकशीबद्दल बोलताना ते म्हणाले की, "महाविकास आघाडीचं सरकार असताना मुंबई पोलिसांना घरगडी सारखं वापरण्याचे असंख्य प्रकार केले. महाविकास आघाडीच्या काळात मुंबई पोलिसांच्या कारवाया फक्त भाजपच्याच नेत्यांवर का व्हायच्या? तेव्हा मविआचे लोक कुठलेही गुन्हे करायचे नाहीत का? तेव्हा आम्ही शेंबड्यासारखे रडलो नाही. या सगळ्याला सामोरं गेलो. रोहित पवारांनी काही केलंच नसेल तर त्यांना घाबरण्याची गरज नाही. युवा संघर्ष यात्रेला कुणी मोजलं नाही म्हणून स्वत:हून लाठीचार्ज करण्याची गरज भासली. जितेंद्र आव्हाडच रोहित पवारांची लायकी काढतात," असा टोलाही त्यांनी लगावला.


अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121