नेटफ्लिक्सची माघार, श्रीरामाचा अपमान करणारा ‘अन्नपुर्णी’ चित्रपट वाहिनीवरुन काढून टाकला

    11-Jan-2024
Total Views | 42

annapoorni  
 
मुंबई : लाखो राम भक्तांच्या भावना दुखावणारा आणि लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारा 'अन्नपुर्णी' चित्रपट अखेर नेटफ्लिक्सवरुन हटवण्यात आला आहे. निलेश क्रिष्णा यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि जतीन सेठी, आर रवीद्र, पुनीत गोयंका (झी एंन्टरटेंमेंन्ट) यांनी निर्मिती केलेल्या या चित्रपटात हिंदुंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणी विश्व हिंदु परिषदेच्या सदस्यांनी नेटफ्लिक्सच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर आंदोलन करत लवकरात लवकर हा चित्रपट नेटफ्लिक्सवरुन हटवण्यात यावा अशी मागनी केली होती. आणि काही वेळानंतर हा चित्रपट नेटफ्लिक्सवरुन काढून टाकण्यात आला आहे.
 
'अन्नपुर्णी' या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा हिची प्रमुख भूमिका असून ती एका पुजाऱ्याची मुलगी आहे. या चित्रपटात लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारी देखील काही दृष्ये दाखवली गेली आहेत. तसेच, प्रभू श्री राम मांसाहारी होते असे वाल्मिकींच्या रामायणात लिहिले आहे असे संवाद चित्रपटाचा नायक फरहान याच्या तोंडी होते. दरम्यान, सर्व निर्मात्यांनी विश्व हिंदु परिषदेस लेखी स्वरुपात माफी मागितली आहे. या माफिनाम्यात लिहिले आहे की, आमच्या हिंदुंना दुखावण्याच्या कोणत्याही भावना नव्हत्या. मात्र, तरीही या माफिनाम्याद्वारे संबंधित समुदायाच्या भावना दुखावल्या आणि झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करू इच्छितो."
 
माजी शिवसेना नेते रमेश सोळंकी यांनी या चित्रपटाची आणि त्यातील आक्षेपार्ह संवाद आणि दृश्यांची दखल घेत अन्नपुर्णी चित्रपटाशी संबंधित नेटफ्लिक्स वाहिनी, दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेत्री नयनतारा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तसेच, लव्ह जिहादला प्रोत्साहन देण्यासाठी काही दृश्ये चित्रटात दाखवले गेले आहेत असे म्हणत सोळंकी यांनी महाराष्ट्र पोलीस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्याकडे निर्माते आणि नेटफ्लिक्सवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.यानंतर आता नेटफ्लिक्सने अन्नपु्रणी चित्रपट काडून टाकल्यानंतर सोळंकी यांनी ट्विट करत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांचे आभार मानले आहेत. 
 
 
 
 
या मुद्द्याबद्दल विश्व हिंदु परिषदेचे प्रांत मंत्री मोहन सालेकर यांनी 'महाएमटीबी'शी संवाद साधत, "नेटफ्लिक्सच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या 'अन्नपूर्णी' चित्रपटामधील आक्षेपार्ह दृश्यांबद्दल बजरंग दलाने तीव्र विरोध केल्यामुळे सदर फिल्म ओटीटी प्लॅटफॉर्मवरून हटविण्यात आली आहे. बजरंग दलाच्या दणक्यामुळे या चित्रपटाचे निर्माते झी स्टुडिओने हिंदू समाजाची माफी मागितली आहे.सदर चित्रपटामध्ये एक ब्राह्मण मुलगी बिर्याणी बनविण्यापूर्वी नमाज पढते आणि त्यामुळे बिर्याणीची चव वाढते, तसेच हिंदू देवी देवता मांसाहारी आहेत अशा प्रकारची अत्यंत आक्षेपार्ह दृश्ये आणि संवाद त्या दाखविण्यात आले होते. हिंदूंच्या भावनांवर आघात करण्याचा प्रयत्न या माध्यमातून वारंवार होताना दिसत आहे. माझी या निर्मात्यांना सूचना आहे की त्यांनी अन्य धर्मीयांच्या बाबतीत अशाच प्रकारचं दृश्य चित्रित करण्याचा प्रयत्न करावा,ज्यामुळे त्यांना लवकरात लवकर जन्नतची द्वारे उघडली जातील आणि त्यांच्या स्वागतासाठी ७२ हुर्या हजर असतील. या निमित्ताने अशा हिंदू विरोधी वाहिन्यांचे आणि चित्रपटांचे निर्माते यांना इशारा देत आहोत,यापुढे तुमचे हे प्रताप हिंदू समाज खपवून घेणार नाही. "नाठाळांचे माथी हाणू काठी "अशी आमच्या संतांची शिकवण आहे", अशा भावना व्यक्त केल्या.
अग्रलेख
जरुर वाचा
कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis शेतीसाठी 'एआय' वर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून, कृषी विभागाच्या सर्व योजना एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी ॲप व संकेतस्थळ विकसित करावे. कृषीमधील स्टॉर्टअपला प्रोत्साहन देवून नवकल्पना विकसित करण्यासाठी कृषी विभागाने प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या भेटीत राज्यातील कृषी क्षेत्रात सहकार्य करण्यास ते इच्छुक असल्याचे त्यांनी असल्याचेही असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले...

बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्या पुतण्यावर किरकोळ कारणावरून गोळीबार

बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्या पुतण्यावर किरकोळ कारणावरून गोळीबार

Bihar मधील भगलापूमधून मोठी बातमी समोर आली आहे. बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंतर राय यांच्या पुतण्यावर गोळीबार करत हत्या करण्यात आल्याची दुर्देवी घटना घडली आहे. पाण्यावरून झालेल्या वादातून दोन भावांनी गोळीबार केला असल्याचे सांगण्यात येत असून ज्यात भाऊ जगजीतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दुसरा भाऊ आणि त्याच्या आईलाही गोळ्या लागल्याने जखमी झाल्याचे वृत्त आहे. नवगछियामधील परबट्टा पोलीस ठाणअंतर्गत गजगतपूर गावात ही घटना घडली आहे. मृत आणि जखमी हे नित्यानंद हे चुलत भावाची मुलं आहेत...

महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या, जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी

"महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या", जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी

MLA MT Krishnappa कर्नाटक राज्यातील जनता दलाचे आमदार एमटी कृष्णाप्पा यांनी विधानसभेत बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्या विधानाने ते पुन्हा एकदा नकारात्मक दृष्टीकोन घेऊन प्रकाशझोतात आले आहेत. काही राज्यांमध्ये महिलांना संबंधित राज्य सरकार प्रतिमहा २ हजार तर महाराष्ट्र राज्यात लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून १५०० रुपये दिले जात आहेत. यावरून कर्नाटकातील पुरूषांना का काही नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जर महिलांना पैसे तर पुरूषांनाही मद्य दिले जावे, असे बेताल वक्तव्य एमटी कृष्णाप्पा यांनी केले ..

आता मुंबई, पुणे नाहीतर सांगलीतही बांगलादेशी घुसखोऱ्यांचा वावर, बनावट कागदपत्रांच्या आधारे केली घुसखोरी

आता मुंबई, पुणे नाहीतर सांगलीतही बांगलादेशी घुसखोऱ्यांचा वावर, बनावट कागदपत्रांच्या आधारे केली घुसखोरी

Bangladesh देशात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट सुरू आहे. मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांप्रमाणेच आता छोट्या शहरांमध्ये तर काही निमशहरांमध्ये बांगलादेशी घुसखोरी असल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीमध्ये बनावट कगदपत्र बनवत एका बांगलादेशी घुसखोऱ्याच्या पोलिसांनी त्याची चौकशी केली आहे. चौकशदरम्यान त्याने आपण बांगलादेशातील ढाकातील असल्याचे सांगितले आहे. आपले मूळ नाव अमीर हुसैन असूनही त्याने अमीर शेख या नावाचा वापर करत बनावट कागदपत्रांचा वापर केला...

मेरठनंतर आता जयपूरमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला जाळले

मेरठनंतर आता जयपूरमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला जाळले

Extramarital Affairsठेवणारी काळीज हेलावून टाकणाऱ्या धक्कादायक घटनेनंतर जयपूरमध्ये पती -पत्नीच्या नात्याला काळीमा लावणारी घटना समोर आली आहे. जयपूरमध्ये एका महिलेचे प्रेमसंबंध असलेल्या परपुरूषाला तिच्या पतीचा खून केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर तिने आपल्या पतीचा मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी सांगितले की, भाजी विक्रेता धन्नलाल सैनी याला त्याच्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती मिळाल्यानंतर तिने प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीला जाळलं आहे...