आता होणार गोंदियातील सारस पक्ष्यांचे सॅटलाईट टॅगिंग

वन विभाग आणि बीएनएचएसमध्ये सामंजस्य करार

    06-Sep-2023   
Total Views | 143

saras conservation

मुंबई (समृद्धी ढमाले): विदर्भातील सारस पक्ष्यांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीकोनातुन गोंदिया वन विभाग आणि बीएनएचएसमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. राज्यातील सारस पक्ष्यांची संख्या सातत्याने कमी होत असुन त्यावर उपाय म्हणुन हा करार करण्यात आला आहे.

गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्येच प्रामुख्याने आढळणाऱ्या सारस पक्ष्यांच्या २०२३ मध्ये झालेल्या शेवटच्या सारस गणनेत केवळ ३५ पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. सातत्याने या पक्ष्यांच्या संख्येत घट झाल्यामुळे सारस नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. बॉंम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि वनविभाग यांच्यात सारस पक्ष्यांचा अधिवास, त्यांची ठिकाणे, प्रजनानाचा काळ, स्थलांतर या गोष्टींचा अभ्यास करण्यात येणार असुन त्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या असल्याचे कळत आहे. पक्ष्यांच्या अधिवासाला, प्रजननाला असणाऱ्या धोक्यांची कारणे शोधुन त्यावर उपाय करण्याच्या दृष्टीकोनातुन या अभ्यासाचा वापर केला जाणार आहे. या करारामध्ये अपेक्षित असलेला निधी या आठवड्यात येणे अपेक्षित असुन लवकरच त्यावर काम सुरू करण्यात येईल.

“या करारामुळे सारस पक्ष्यांचा अधिवास वाचविण्यासाठी नक्कीच फायदा होईल असे वाटते. विशेष म्हणजे या अभ्यासादरम्यान काही सारस पक्ष्यांचे सॅटेलाईट टॅगींग ही केले जाणार आहे. त्यामुळे त्यांच्या स्थलांतराविषयी ही नवीन माहिती हाती लागणार आहे.”

- किशोर रिठे
अंतरिम संचालक,
बॉंम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी


समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड. 
अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121