मंत्रालयात कामासाठी जातायं? वाचा नवे नियम!

    27-Sep-2023
Total Views | 153

mantralaya


मुंबई :
मंत्रालयात केल्या जाणाऱ्या आत्महत्येच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शासनाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. मंगळवारी दुपारी एका व्यक्तीने शिक्षक भरती लवकर घेण्यात यावी तसेच कंत्राटी पद्धतीने करण्यात येणारी भरती थांबविण्यात यावी या मागण्यांसाठी दुसऱ्या मजल्यावरून सुरक्षा जाळीवर उडी मारून आंदोलन केले. दरम्यान, या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर गृहविभागाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या सुचनांमुळे मंत्रालयात होणारे प्रकार थांबण्यास यश मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार आता मंत्रालयात येणाऱ्या सर्व व्यक्तींना प्रवेश पास हा बंधनकारक असणार आहे. तर येत्या काही दिवसांत ऑनलाईन पासेस देण्याची सुविधा सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

मंत्रालयामध्ये येणाऱ्या अभ्यागतांची संख्या दरदिवशी ५,००० पेक्षा जास्त असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे मंत्रालयात यापुढे किती व्यक्तींना प्रवेश देण्यात यावा याबाबत पोलीस उपायुक्त मंत्रालय सुरक्षा यांना सूचना देण्यात आल्या आहेत. एका महिन्याच्या आत त्यांच्याकडे याबाबतचा अहवाल मागवण्यात आला आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
तहव्वूर राणाच्या एनआयए चौकशीला सुरुवात! एनआयए मुख्यालयाबाहेर सुरक्षेत वाढ; फक्त १२ अधिकाऱ्यांनाच चौकशी कक्षात प्रवेश

तहव्वूर राणाच्या एनआयए चौकशीला सुरुवात! एनआयए मुख्यालयाबाहेर सुरक्षेत वाढ; फक्त १२ अधिकाऱ्यांनाच चौकशी कक्षात प्रवेश

(Tahawwur Rana's NIA Interrogation Begins) २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार दहशतवादी तहव्वूर राणाचे अखेर गुरुवारी १० एप्रिल रोजी तब्बल १७ वर्षांनी भारतात यशस्वी प्रत्यार्पण झाले आहे. गुरुवारी १० एप्रिलला रात्री राणाला दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एनआयएच्या विशेष न्यायालयाकडे एनआयएने २० दिवसांची कोठडी मागितली होती. परंतु, न्यायालयाने एनआयएला राणाची १८ दिवसांची कोठडी दिली. ताब्यात घेतल्यानंतर, तहव्वूर राणाची आता एनआयए मुख्यालयात चौकशीला सुरुवात झाली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121