डिझेल वाहनांवर १०% जादा कर लागणार का? जाणून घ्या काय म्हणाले केंद्रीय मंत्री!

    12-Sep-2023
Total Views | 35
Additional 10% tax on diesel engine vehicles? Nitin Gadkari clarifies

नवी दिल्ली : डिझेल वाहनांवर कर लावण्याचा भारत सरकारचा कोणताही विचार नसल्याचे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. त्याचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर गोंधळ उडाला होता, ज्याबद्दल त्यांनी आता स्पष्टीकरण दिले आहे. नितीन गडकरी यांनी एका ट्विटद्वारे म्हटले आहे की, मीडिया रिपोर्ट्सवर तात्काळ स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे ज्यामध्ये डिझेल वाहनांच्या विक्रीवर 10% कर लावण्याची चर्चा आहे.

नितीन गडकरी म्हणाले की, सध्या भारत सरकारकडे या विषयावर कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही, हे स्पष्ट करणे गरजेचे आहे. २०७० पर्यंत भारताला कार्बन उत्सर्जन शून्यावर नेण्याची इच्छा असल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले की, डिझेल आणि वाहनांसारख्या इंधनाच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे वायू प्रदूषणात वाढ रोखण्यासाठी अधिक स्वच्छ आणि हरित ऊर्जा पर्यायांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. ते म्हणाले की, हे इंधन स्वदेशी, प्रदूषणमुक्त आणि स्वस्त असावे, बाहेरून आयात करण्याची गरज नसावी.

एका कार्यक्रमात त्यांनी केलेल्या भाषणानंतर मीडिया आणि सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली, ज्यामध्ये ते म्हणाले, “प्रदूषण ही एक अतिशय गंभीर समस्या आहे आणि त्याचा आपल्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. अर्थमंत्री माझ्या घरी बैठकीसाठी येणार आहेत आणि मी त्यांना डिझेलवर चालणाऱ्या सर्व वाहनांवर अतिरिक्त 10% GST लावण्याची विनंती करणार आहे. कारण लोकं पटकन ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत.”

या विधानानंतर मोदी सरकार डिझेल वाहनांवर 10% अतिरिक्त कर लावणार असल्याचे मीडियामध्ये दिसायला लागले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले होते की २०१४ नंतर 22% डिझेल वाहने आता 18% वर आली आहेत. ऑटोमोबाईल उद्योग वाढत असल्याने डिझेल वाहने वाढू नयेत, असे ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी अतिरिक्त कर लावण्याबाबत बोलले. मात्र, आता त्यांच्या ट्विटनंतर अशी कोणतीही योजना नसल्याचे स्पष्ट झाले असून मोदी सरकार डिझेल वाहनांवर अतिरिक्त कर लावणार नाही.


 
अग्रलेख
जरुर वाचा
सामर्थ्य-परमार्थाचा मेळ म्हणजे मधु मंगेश कर्णिक!

सामर्थ्य-परमार्थाचा मेळ म्हणजे मधु मंगेश कर्णिक!

"कोकणी माणसाचे भावविश्‍व मराठी साहित्यामध्ये योग्य शब्दात चितरणारे मधु मंगेश कर्णिक म्हणजे सामर्थ्य आणि परमार्थाचा अनोखा संगम आहे" असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या ९५व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याच्या भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ, अध्यक्ष ..

पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर: मुख्यमंत्री

पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर: मुख्यमंत्री

महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरातील पर्यटकांना परत महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने केलेले तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन आज मुंबईत दाखल झाले. मंत्री आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. यातील अकोला, अमरावती येथील प्रवाशांच्या पुढच्या प्रवासासाठी बसेसची व्यवस्था सुद्धा करण्यात आली. आतापर्यंत सुमारे ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121