मुंबईत घातपाताचा कट उधळला; संशयित दहशतवाद्यांकडून माहिती

    06-Aug-2023
Total Views | 266
NIA makes sixth arrest in ISIS Maharashtra module case

मुंबई
: दहशतवादी कट कारस्थानात सहभागी असल्याच्या आरोपाखाली गेल्या काही दिवसांत सहा जणांना राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)ने ताब्यात घेतले आहे. हे दहशतवादी मुंबईत मोठा घातपात करण्याच्या तयारीत असल्याची माहिती उघड झाली आहे. वेळीच त्यांना ताब्यात घेण्यात आल्यामुळे घातपाताचा डाव उधळण्यात आला आहे.

दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि ‘एनआयए’ने अनेक संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतले, असून दि. ५ ऑगस्ट रोजी ‘आयसिस’च्या महाराष्ट्र मोड्यूलशी संबंधित सहावी अटक करण्यात आली. या संशयितांकडून महत्त्वपूर्ण माहिती हाती लागली आहे. ‘एनआयए’च्या पथकाने आकिफ नाचनला भिवंडीमधील पडघ्यातून अटक केली. त्याची चौकशी केली असता, त्याच्याकडून घातपाताच्या हल्ल्यासंदर्भात धक्कादायक माहिती मिळाली आहे.

आकिफला ‘एनआयए’ने न्यायालयात हजर केले असता, युक्तिवाद करताना ‘एनआयए’च्या वकिलांनी दावा केला की, या सर्व दहशतवाद्याचा मुंबईमध्ये दहशतवादी कारवाई करण्याचा हेतू होता. मात्र, त्यांनी हे कारस्थान करण्याआधीचं त्या सर्वांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे आणि अजूनही लोक यात सामील असू शकतात, अशी शक्यता ‘एनआय’ने वर्तवली आहे. नाचन आणि इतरांना परदेशी दहशतवादी संघटनांनी प्रशिक्षण दिल्याचा दावाही करण्यात आला आहे.

या संशयित दहशतवाद्यांची चौकशी केली असता, हे लोक एकमेकांशी संपर्क करण्यासाठी उच्च तंत्रज्ञान यंत्रणेचा वापर करत असल्याचेही निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात आकिफने इतर आरोपींच्या राहण्याची सोय केली होती. तसेच, तो स्फोटके बनवून त्याच्या परिक्षणात सहभागी होता, असा दावाही ‘एनआयए’ने केलेल्या आरोपातआहे.

आकिफ इतर आरोपींच्या मदतीने मुंबईत घातपात करण्याच्या तयारीत होता. त्याच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स साहित्य आणि बनावट कागदपत्रे सापडली आहेत. याआधी महाराष्ट्राच्या विविध भागातूनसंशयित दहशतवाद्यांना तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले होते. यातील दोघांना पुण्यातील कोथरुडमधून, एकाला रत्नागिरीमधून अटक करण्यात आली होती.


अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

'या'देशातील मुस्लिमांना हजयात्रा करता येणार नाही, भारतासोबत १४ देशातील नागरिकांच्या व्हिसांवर बंदी

Hajj जगभरातील असंख्य मुस्लिम हजसाठी आणि उमराहसाठी सौदी अरेबियात दाखल होत असतात. यावेळी सौदी अरेबिया सरकारने कठोर पाऊल उचलत भारतासोबत इतर १४ देशांना तात्पुरता व्हिसा देण्यासाठी त्यांनी बंदी घातली आहे. सरकारचे म्हणणे आहे की, या देशामध्ये असंख्य लोक हे व्हिसा नियमांचे पालक करत नाहीत आणि नोंदणीशिवाय हजमध्ये सहभागी होणार नाहीत. यावेळी सरकारने कठोर भूमिका घेत नोंदणीशिवाय कोणालाही हजला जाता येणार नाही असे सांगितले आहे. जर विनानोंदणीचे कोणी आढळल्यास त्याला पाच वर्षांसाठी सौदी अरेबियेत प्रवेश दिला जाणार नाही...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121