थायलंडमधुन तस्करी केलेले जीव आता गुजरातच्या जामनगर प्राणीसंग्रहालयात

    05-Aug-2023   
Total Views | 46



thailand smuggling
मुंबई (विशेष प्रतिनिधी): महसूल गुप्तचर संचलनालयाच्या (DRI) मुंबई विभागीय युनिटने मुंबईतील एअर कार्गो कॉम्प्लेक्सद्वारे थायलंडमधून भारतात तस्करी केल्या जाणाऱ्या ३०६ विदेशी प्राण्यांना शुक्रवार दि. २८ जूलै रोजी पहाटे ४च्या सुमारास पकडल्याचे वृत्त नुकतेच समोर आले. यामध्ये महसूल गुप्तचर संचलनालय आणि वाइल्डलाइफ क्राईम कंट्रोल ब्युरो (WCCB) यांनी एकत्रितपमे कारवी केली असुन ३०६ जीवंत विदेशी प्राण्यांना पकडण्यात आले आहे.
तस्करी केलेल्या या प्राण्यांमध्ये १०० टर्टल्स, ६२ टॉरटॉइजेस, ११० गोगलगाय, ३० लहान खेकडे आणि ४ स्टिंग रे मासे यांचा समावेश आहे. स्टिंग रे मासे शोभेच्या माशांसह लपवून ठेवले होते. जप्त केलेले कासव हे ग्रीक कासव, लाल पाय असलेले कासव, आशियाई स्पर्ड कासव, पिवळे ठिपके असलेले कासव, अल्बिनो रेडियर स्लाइडर कासव, आशियाई/चायनीज लीफ टर्टल आणि रेड बेलीड शॉर्ट हेड टर्टल या प्रजातींचे आहेत.
या वन्यजीवांना ताब्यात घेतल्यानंतर कायदेशीररित्या थायलंडच्या सरकारला हे प्राणी आणि तस्करी बाबत तसेच ते प्राणी पुन्हा स्वदेशी परत नेण्याबाबत पत्र लिहिले गेले होते. पण या पत्राला थायलंडकडुन कोणतेही उत्तर आले नाही. कायद्यातील पुढील तरतुदीनुसार पत्राचे उत्तर किंवा पुढील कारवाई न आल्यास हे प्राणी आपल्याच देशात रिइंट्रोड्युस म्हणजेच पुनर्विस्थापित करण्याची तरतुद आहे. त्याप्रमाणे केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणांतर्गत येणाऱ्या संग्रहालयात या प्राण्यांना ठेवण्याचा निर्णय झाला होता. दरम्यान, मुंबईतील भायखळा येथील प्राणीसंग्रहालयात हे प्राणी ठेवण्याची सोय होऊ शकली नाही म्हणुन यातील साइटीस अंतर्गत येणाऱ्या प्रजातींना गुजरातच्या जामनगर प्राणीसंग्रहालयात पाठविण्यात आले आहे.
कस्टम कायदा (१९६२) मधील तरतुदीनुसार केलेल्या उल्लंघणामुळे या तस्करावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन कायद्यान्वये त्याला शिक्षा आणि दंड देण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे.





समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड. 
अग्रलेख
जरुर वाचा
‘ऑपरेशन सिंदूर’ : सामरिक स्वावलंबनाचा नवा मानदंड

‘ऑपरेशन सिंदूर’ : सामरिक स्वावलंबनाचा नवा मानदंड

विसाव्या शतकातील जागतिक संघर्षांच्या अनुभवातून शिकत, भारताने एकविसाव्या शतकात आपल्या संरक्षण धोरणात निर्णायक बदल केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे या परिवर्तनाचे अत्यंत प्रभावी उदाहरण. ही मोहीम केवळ सैनिकी विजयावर सीमित राहिली नाही, तर भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या वाढत्या क्षमतेचे प्रतीक बनली. तसेच या मोहिमेने जगाला एक स्पष्ट संदेश दिला की, भारत आता कोणत्याही शत्रूला त्याच्याच भाषेत उत्तर देण्यास पूर्णपणे सक्षम आहे. या यशाने भारताच्या परराष्ट्र धोरणात एक नवा मानदंड स्थापित केला आणि जागतिक मंचावर आपल्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121