काय आहे खिचडी घोटाळा? ज्यामुळे अडचणीत आलेत राऊतांचे दोस्त!

    21-Aug-2023
Total Views | 139

Khichdi scam 
 
 
मुंबई : स्थलांतरित मजुरांना २५ लाख खिचडी पॅकेट पुरवण्याच्या नावाखाली पालिकेकडून ८ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. यामध्ये ‘सह्याद्री रिफ्रेशमेंट’ कंपनीचा सहभाग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या घोटाळ्यावरून सोमय्या यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप केले आहेत. संजय राऊत यांच्या मित्र-परिवाराची ही कंपनी असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.
 
कोविड काळातील लॉकडाऊन दरम्यान मुंबईतील स्थलांतरित मजुरांना २५ लाख खिचडी पॅकेट पुरवण्यात आले होते. खिचडी पॅकेट पुरवण्याच्या नावाखाली पालिकेकडून ८.१० कोटी रुपये मिळाले. त्यातील ४ कोटी बोगस कंपन्यांना ट्रान्स्फर केले असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांनी बोगस कंपन्या आणि नेत्यांच्या नावावर हा कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

'सिंधू पाणी करारा'ला पहिल्यांदाच स्थगिती, काय आहे हा करार? पाकिस्तानवर या निर्णयाचा काय परिणाम होणार?

(Indus Water Treaty) मंगळवारी २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर पावलं उचलत पाकिस्तानची राजकीय कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडलेल्या संरक्षणविषयक बैठकीत १९६० च्या 'सिंधू पाणी करार'स स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत सिंधू जल करार रद्द करण्यासह पाच मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांचा मोठा फटका पाकिस्तानला बसणार आहे. मात्र, भारत आणि पाकिस्तानसाठी अतिशय महत्त्वाचा असणारा ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121