अलिबाग येथील नागाव व चौल येथे २४ तासात दिल्या अकरा नवीन वीज जोडणी

    18-Aug-2023
Total Views | 103

Mahavitaran


मुंबई :
नवीन वीज जोडणी घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना शहरी भागात २४ तासात तर ग्रामीण भागात ४८ तासात वीज जोडणी देण्याची महावितरणची मोहीम राज्यभर सुरु आहे. नव्या वीज जोडणीसाठीचे अर्ज तातडीने निकाली काढण्याचे आदेश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री.लोकेश चंद्र यांनी सर्व परिमंडलांना दिले होते.
 
मुख्य अभियंता श्री.सुनिल काकडे या कामाबाबत प्रत्येक मंडळाचा दररोज आढावा घेत आहेत. त्यानुसार, महावितरण अलिबाग येथील नागाव शाखेत ११ अर्जदारांना सर्व प्रक्रिया पूर्ण करून २४ तासांच्या आत वीज जोडण्या देण्यात आल्या. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री ना. श्री.देवेंद्र फडणवीस यांनी ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी नवीन वीज जोडणीच्या कामाला वेग देण्याची सूचना केली आहे. त्याप्रमाणे, वीज जोडणीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी २४ तासाच्या आत वीज जोडणी देण्याचे प्रयत्न कर्मचारी करत आहेत.
 
ग्राहकाने अर्ज केल्यानंतर महावितरणचे कर्मचारी जागेची पाहणी करून किती शुल्क भरायचे याची माहिती देतात. कागद पत्रांची पडताळणी करून त्यांच्याकडून आवश्यक शुल्क भरून घेतल्यानंतर काही तासातच ११ नवीन वीज जोडणी देण्याचे उपक्रम महावितरणच्या भांडूप परिमंडलातील नागाव शाखेने केले आहे.
 
महावितरणच्या नागाव व चौल भागात दि.१७ ऑगस्ट २०२३ रोजी नवीन वीज जोडणीसाठी एकूण ११ नवीन अर्ज प्राप्त झाले. कार्यकारी अभियंता, अलिबाग श्री. शैलेश कुमार व अति. कार्यकारी अभियंता अलिबाग उपविभाग १ श्री.प्रशांत बानाईत यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करून २४ तासाच्या आत ग्राहकांना नवीन वीज जोडण्या दिल्या. याबाबत, अधीक्षक अभियंता पेण श्री.इब्राहीम मुलाणी यांनी त्यांचे कौतुक केले. अर्ज केल्यानंतर तातडीने वीज जोडणी मिळाल्याबद्दल ग्राहकांनी महावितरणच्या नागाव शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.


अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121