अलिबाग येथील नागाव व चौल येथे २४ तासात दिल्या अकरा नवीन वीज जोडणी
18-Aug-2023
Total Views | 103
मुंबई : नवीन वीज जोडणी घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना शहरी भागात २४ तासात तर ग्रामीण भागात ४८ तासात वीज जोडणी देण्याची महावितरणची मोहीम राज्यभर सुरु आहे. नव्या वीज जोडणीसाठीचे अर्ज तातडीने निकाली काढण्याचे आदेश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री.लोकेश चंद्र यांनी सर्व परिमंडलांना दिले होते.
मुख्य अभियंता श्री.सुनिल काकडे या कामाबाबत प्रत्येक मंडळाचा दररोज आढावा घेत आहेत. त्यानुसार, महावितरण अलिबाग येथील नागाव शाखेत ११ अर्जदारांना सर्व प्रक्रिया पूर्ण करून २४ तासांच्या आत वीज जोडण्या देण्यात आल्या. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री ना. श्री.देवेंद्र फडणवीस यांनी ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी नवीन वीज जोडणीच्या कामाला वेग देण्याची सूचना केली आहे. त्याप्रमाणे, वीज जोडणीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी २४ तासाच्या आत वीज जोडणी देण्याचे प्रयत्न कर्मचारी करत आहेत.
ग्राहकाने अर्ज केल्यानंतर महावितरणचे कर्मचारी जागेची पाहणी करून किती शुल्क भरायचे याची माहिती देतात. कागद पत्रांची पडताळणी करून त्यांच्याकडून आवश्यक शुल्क भरून घेतल्यानंतर काही तासातच ११ नवीन वीज जोडणी देण्याचे उपक्रम महावितरणच्या भांडूप परिमंडलातील नागाव शाखेने केले आहे.
महावितरणच्या नागाव व चौल भागात दि.१७ ऑगस्ट २०२३ रोजी नवीन वीज जोडणीसाठी एकूण ११ नवीन अर्ज प्राप्त झाले. कार्यकारी अभियंता, अलिबाग श्री. शैलेश कुमार व अति. कार्यकारी अभियंता अलिबाग उपविभाग १ श्री.प्रशांत बानाईत यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करून २४ तासाच्या आत ग्राहकांना नवीन वीज जोडण्या दिल्या. याबाबत, अधीक्षक अभियंता पेण श्री.इब्राहीम मुलाणी यांनी त्यांचे कौतुक केले. अर्ज केल्यानंतर तातडीने वीज जोडणी मिळाल्याबद्दल ग्राहकांनी महावितरणच्या नागाव शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.