खलिस्तानविरोधी कारवाईसाठी युके सज्ज, नव्या फंडाची केली घोषणा

    11-Aug-2023
Total Views | 44
UK Security Minister announces a Task Force

नवी दिल्ली
: खलिस्तान समर्थक कट्टरवाद्यांशी सामना करण्यासाठी युकेने नवा फंड जाहीर केला आहे. भारत आणि युके कट्टरतावादाशी लढण्यासाठी संयुक्त कार्य दलाच्या स्थापनेसाठीदेखील काम करत आहेत.

भारतातील ब्रिटीश उच्चायुक्त म्हणाले की भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि युकेचे संरक्षण मंत्री टुगेनहाट यांच्यात झालेल्या बैठकीत त्यांनी नवीन निधीची घोषणा केली आहे, ज्यामुळे खलिस्तान समर्थक अतिरेक्यांना सामोरे जाण्यासाठी ब्रिटनची क्षमता वाढेल. ९५ हजार पौंडांची (सुमारे एक कोटी रुपये) गुंतवणूक करून युके सरकार खलिस्तान समर्थक अतिरेक्यांविरोधात कारवाई कठोर करणार आहे. भारत आणि युकेमध्ये जॉइंट रॅडिकलायझेशन टास्क फोर्स स्थापन करण्याची प्रक्रिया आधीच सुरू आहे, असेही ते म्हणाले.

ब्रिटनचे संरक्षण मंत्री टुगेनहाट तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. भारत ब्रिटनसमोर सातत्याने खलिस्तानी दहशतवादाचा मुद्दा मांडत आहे. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तावर खलिस्तान्यांनी केलेल्या हल्ल्याविरोधा भारताने युकेला सुनावले होते. या प्रकरणाचा तपासही राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविण्यात आला आहे.






अग्रलेख
जरुर वाचा
हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

Kancha Gachibowli तेलंगणा राज्यातील हैदराबाद विद्यापीठाच्या नजीक असणाऱ्या कांचा गचिबोवली (Kancha Gachibowli) ही ४०० एकर जंगलतोड करण्यात आली. तेलंगणा सरकारने आयटी कंपनी उभारण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र त्यांनी जंगलातील झाडे कापून नैसर्गिक हानी केली आहे. यामुळे संबंथित विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले होते. कांचा गचिबोवली जंगलात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक करणासाठी फायदेशीर जंगल होते. यालाच देशभरातून विविध माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच पद्धतीने आता ..

वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

Waqf Act संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ सुधारित कायदा पारित झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सही करत कायद्याला मंजूरी देत वाट मोकळी केली आहे. याचा देशभरात चांगला प्रतिसाद दिसत आहे. तर काही धर्मांध यांचा गैर अपप्रचार करत आहेत. वक्फ कायदा लागू झाल्यानंतर इतरांच्या मालकी हक्कांवर वक्फ दावा करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. अशातच आता असेच एक प्रकरण समोर आले आहे. ज्यात अवैधपणे जमिनींवर वक्फने दावा केला आणि आता त्याविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बरेलीतील असल्याचे सांगण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121