मुंबईत अतिमुसळधार: अनेक भागात साचलं पाणी!

    27-Jul-2023
Total Views | 291
 
mansoon update
 
 
मुंबई : मुंबईसह राज्यातील पाच जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यातील मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, पालघर, नाशिक, यवतमाळ आणि चंद्रपूर या पाच जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.त्यामुळे मुंबईसह पाच जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दुपारनंतर मुंबईत पावसाचा जोर वाढेल असाही अंदाज आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच याकाळात मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.
 
जोरदार पावसाने अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. अंधेरी , मालाड, कांदिवली बोरिवली इथेही पावसाला जोरदार सुरूवात झाली असून अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. चर्चगेटजवळ रेल्वे परिसरात पाणी साचलं आहे. रेल्वे रुळांवरच पाणी रस्त्यावर आल्याने सखल भागात पाणी साचलं आहे. माथेरानच्या मालडुंगा पॉईंट येथे पावसामुळे भूस्खलन झाले आहे. यामुळे हा पाईंट पर्यटनासाठी बंद करण्यात आला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे भुस्खलन झाले आहे. सुदैवाने या ठिकाणी वस्ती नाही. यामुळे कोणतीही हानी झाली नाही.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
आता महिला-युवतींची छेडछाड करणाऱ्यांना सुट्टी नाही, मुख्यमंत्री रेखा गुप्तांचा दिल्लीत

आता महिला-युवतींची छेडछाड करणाऱ्यांना सुट्टी नाही, मुख्यमंत्री रेखा गुप्तांचा दिल्लीत 'शिष्टाचार पथक' फॉर्म्युला

Rekha Gupta दिल्लीत महिलांच्या सुरक्षेसाठी नवनिर्वाचित भाजपच्या महिला मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी कामचा सपाटा लावून धरला आहे. त्यानी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसल्यानंतर महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यांनी नाले आणि नदी सफाईबाबत उचलेले पाऊल उल्लेखनीय आहे. अशातच आता त्यांनी दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेसाठी पाऊल उचलले आहे. यामुळे आता काही महिला, युवतींना छेडछाड करणाऱ्याला सुट्टी नसणार आहे. त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी रेखा गुप्ता यांनी शिष्टाचार पथकाच्या फॉर्म्युल्याचा वापर ..

कबरीच्या वादात सुप्रिया सुळेंची उडी; म्हणाल्या, बऱ्याच गोष्टी या आस्थेचे विषय...

कबरीच्या वादात सुप्रिया सुळेंची उडी; म्हणाल्या, "बऱ्याच गोष्टी या आस्थेचे विषय..."

राज्यात औरंगजेबच्या कबरीवरून तणाव चांगलाच वाढल्याचं दिसतंय. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानेही सोमवारी कबर हटवण्यावरून राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका मांडल्याचं पाहायला मिळतंय. "जो काही निर्णय घ्यायचा आहे तो इतिहासकारांना घेऊ द्या. बऱ्याच गोष्टी या आस्थेचे विषय असतात. प्रत्येकाच्या आस्थेचा विषय असून यात कोणीही ढवळाढवळ करू नये", असे सुप्रिया सुळे यांचे म्हणणे आहे. Supriya Sule on Aurangzeb Kabar..