'तुरुंगात आयुष्य घालवेन, पण पाकिस्तानात जाणार नाही' ; सीमा हैदरने राष्ट्रपतींना पाठवले पत्र!

    22-Jul-2023
Total Views | 74
Seema Haider update

नवी दिल्ली
: सीमा हैदर हिने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अर्ज पाठवला आहे. त्या अर्जात भारताचे नागरिकत्व देण्याची विनंती केली आहे. त्याचवेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तिने तुरुंगात आयुष्य घालवणार, पण पाकिस्तानात जाणार नसल्याचे सांगितले आहे. सचिन माझं आयुष्य असल्याचे सांगत.सीमा म्हणाली की, तिचा एकच गुन्हा आहे की ती नेपाळमार्गे भारतात आली. दरम्यान, सचिनसोबतच्या तिच्या लग्नाचे काही फोटोही व्हायरल होत आहेत.

सीमाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे ३८ पानी दयेचा अर्ज पाठवला आहे. यामध्ये तिने आपल्या मुलांसह भारतात राहण्याची परवानगी देण्याची विनंती केली आहे. याचिकेत सीमाने सचिनची पत्नी असल्याचे सांगत लग्नाची छायाचित्रेही राष्ट्रपतींकडे पाठवली आहेत. याचिकेत तिने १३ मार्च रोजी नेपाळमधील काठमांडू येथील पशुपती नाथ मंदिरात सचिनसोबत लग्न केल्याची माहिती दिली. विशेष म्हणजे, दोघेही नेपाळमधील एका हॉटेलमध्ये एकत्र राहत असल्याची चर्चा याआधीही समोर आली आहे.

व्हायरल होत असलेल्या लग्नाच्या फोटोंमध्ये सीमा हिंदू पोशाखात दिसत आहे. तसेच त्या छायाचित्रात ती सचिनच्या गळ्यात माळ घालत आहे. तिच्या हातात बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळावर सिंदूर आहे. काही फोटोंमध्ये दोघेही मुलांसोबत दिसत आहेत. नोएडाची रबुपुरामधून आलेली सीमा तिच्या चार मुलांसह पाकिस्तानची गुप्तहेर असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. यूपी एटीएसनेही त्याची चौकशी केली आहे.
 
चौकशीनंतर सीमाने पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाकिस्तानला न पाठवण्याची विनंती केली आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सीमा हैदर म्हणाली, “मी गुप्तहेर नाही. लवकरच संपूर्ण सत्य बाहेर येईल. मी मोदीजी आणि योगजींना विनंती करते की, मला परत पाठवू नका. माझ्याकडे भारतात येण्याचा दुसरा मार्ग नव्हता. त्यामुळेच मी बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून इथे आले. तसेच मी माझ्याशी संबंधित कोणतीही माहिती लपवलेली नाही.

यूपी एटीएसच्या चौकशीदरम्यान सीमा म्हणाली की, “माझ्यावर सुरुवातीपासूनच संशय घेतला जात आहे. मी माझ्या गावापासून कराचीपर्यंतची सर्व माहिती सांगितली आहे. मी असहाय्य होते. मला भारतात यायचे होते. पण मला इथे व्हिसा मिळत नव्हता. सचिनशिवाय जगणे माझ्यासाठी अशक्य होते. ओळखपत्रात वय कमी लिहिल्याबद्दल सीमा म्हणाली, “पाकिस्तानमध्ये वयाचा प्रश्नच येत नाही. तिथे प्रत्येकाचे वय सारखे लिहिले आहे. माझ्या मुलांचे वयही १-१ वर्षे कमी लिहिले आहे.
 
नेपाळच्या हॉटेल विनायकमध्ये तिचे नाव प्रीती लिहिल्याबद्दल सीमा म्हणाली, “हॉटेलवाले उघड खोटे बोलत आहेत. त्याने आम्हाला नाव विचारले नाही. ते स्वतःला वाचवण्यासाठी हे सर्व सांगत आहेत. नेपाळमधील पशुपती नाथ मंदिराशिवाय आम्ही कुठेही गेलो नाही. मी गेल्या एक वर्षापासून हिंदू आहे. मी हिंदू म्हणून पाकिस्तानात राहू शकत नाही. मी भारतात जात असल्याचे पाकिस्तानातील कोणाला कळले असते तर त्यांनी मला मारले असते. नेपाळमध्येही मी स्वतःला हिंदू म्हणवून घेत होते. माझा दोन वर्षे जुना व्हिडिओ काढा आणि बघा. माझ्या कपाळावर सचिनच्या नावावर सिंदूर असेल. मी सचिनला माझा नवरा मानते.

सीमा हैदरने असेही म्हटले आहे की, तिला ८ मे रोजी व्हिसा आणि पासपोर्ट बनवल्याचे खोटे बोलले जात आहे. त्याच्याकडे आधीच पासपोर्ट होता. तसेच तिच्याकडून ६ पासपोर्ट मिळाल्याबाबत सांगताना ती म्हणाली, या ४ पासपोर्टपैकी २ पासपोर्ट माझ्या मुलांचे आहेत. मात्र तिच्या एका पासपोर्टवर आडनाव नसल्याने तिला नेपाळचा व्हिसा मिळाला नाही. त्यामुळेच त्यांनी पुन्हा पासपोर्ट बनवला.



 
अग्रलेख
जरुर वाचा
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

Tahawwur Rana काँग्रेस नेतृत्वाखालील असणाऱ्या युपीए सरकारला सत्तेतून बाहेर जाऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विरोधक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए सरकारच्या प्रत्येक कामाचे श्रेय हे स्वत:घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून युपीए सरकारच्या शासनकाळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संबंधित दहशतवाद्याचे प्रत्यार्पित करण्यात आले. मात्र, याचे सर्व श्रेय हे काँग्रेस घेत असल्याच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121