राजस्थानात चार जणांची गळा कापून हत्या! सहा महिन्यांच्या बाळाला आईसह जाळलं!

    21-Jul-2023
Total Views | 574
rajshtan
 
जयपूर : जोधपूर पोलिसांना मंगळवारी राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील चेराई गावात सहा महिन्यांच्या मुलीसह एकाच कुटुंबातील चार सदस्यांचे जळलेले मृतदेह सापडले. मारेकऱ्यांनी त्यांचा गळा चिरून, अंगणात ओढून जाळून टाकल्याची माहिती आहे. कुटुंबाच्या घराला आग लावल्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.
 
पूनराम (५५), त्यांची पत्नी भंवरी देवी (५०), त्यांची सून धापू (२३) आणि तिची सहा महिन्यांची मुलगी मनीषा अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पूनराम यांचा मुलगा रेवताराम मंगळवारी रात्री जेवण करून दगडखाणीत कामासाठी निघाला होता. त्यानंतर रात्री उशिरा एका घरातून धूर निघत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना चार जणांचे जळालेले मृतदेह आढळून आले.
 
गावकऱ्यांच्या माहितीवरून एसपी (जोधपूर ग्रामीण) धर्मेंद्र सिंह यादव पोलिस दलासह घटनास्थळी पोहोचले. बाळाचे शरीर पूर्णपणे जळाले होते, तर इतरांचे शरीर अर्धवट जळाले होते, असे पोलिसांनी सांगितले, ते झोपेत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही हत्या सूडबुद्धीने करण्यात आल्याचे दिसते. हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने, बहुधा कुऱ्हाडीने गळा चिरल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानंतर त्यांचे मृतदेह घराबाहेर ओढून जाळण्यात आले.
 
या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यासाठी श्वान पथक आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) पथकालाही पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या प्रकरणाची माहिती असलेल्या काही लोकांनी दावा केला की, पोलीस पूनरामचा भाऊ आणि पुतण्या यांची चौकशी करत आहेत.
 
राज्यात झालेल्या भीषण हत्याकांडानंतर विरोधी पक्ष भाजपने राज्य सरकारवर टिका केली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या ढासळलेल्या परिस्थितीवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला. गुन्ह्याची जागा ही राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मतदारसंघाजवळ येते हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
 
मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत राजस्थान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रप्रकाश जोशी म्हणाले की, “या घटना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या भागात घडत आहेत. यावरून राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचे स्पष्ट होते. शहरात कोणीही सुरक्षित नाही. मग ती मुले असोत किंवा महिला असोत. हे सर्व अत्यंत दुर्दैवी आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
Ind vs Pak युद्धात अमेरिकेची एन्ट्री! ट्रम्प यांनी पाक सरकारला सुनावले

Ind vs Pak युद्धात अमेरिकेची एन्ट्री! ट्रम्प यांनी पाक सरकारला सुनावले

भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवत चोख प्रत्युत्तर देण्यास बुधवार, दि. ७ मे रोजी सुरुवात केली. त्यात पाकिस्तानातील दहशतवाद्यांची ९ ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली. अशातच आता सीमावर्तीभागात भारतीय लष्कराच्या जोरदार हालचाली होताना दिसतायत. पाकिस्तान भारतावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहे परंतु भारताची अत्याधुनिक यंत्रणा पाकिस्तानचा प्रयत्न अयशस्वी करत आहेत. अशातच भारत-पाकिस्तान युद्धात आता अमेरिकेची एन्ट्री झाली आहे. पाकिस्तानला तात्काळ मागे हटण्याचे आणि भारतासोबतचा तणाव त्वरित कमी करण्याचे आदेश अमेरिक..

Operation Sindoor LIVE updates : पाकिस्तानकडून हल्ल्यासाठी हमाससारख्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न!

Operation Sindoor LIVE updates : पाकिस्तानकडून हल्ल्यासाठी हमाससारख्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न!

पाकिस्तानी लष्करातर्फे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना हमासप्रमाणे हल्ले करण्यात येत आहेत. खात्रीलायक संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून सतवारी, सांबा, आरएस पुरा आणि अर्निया येथे ८ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. मात्र, भारताच्या हवाई संरक्षण प्रणालींनी पाकची सर्वच क्षेपणास्त्रे अडवून निष्प्रभ केली. जम्मूवर डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांना बघितल्यास ती दृश्ये इस्रायलवरील हमास शैलीच्या हल्ल्याची आठवण करून देतात. हमासतर्फेही इस्रायलर अतिशय किरकोळ दर्जाची क्षेपणास्त्रे डागण्यात येत असतात. विशेष ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121