नवी दिल्ली : भारतीयांना आता लवकरच ई-पासपोर्ट मिळणार आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पासपोर्ट सेवा दिवसानिमित्त लवकरच पासपोर्ट सेवा कार्यक्रम २.० सुरू करण्याची घोषणा केली आहे. हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर लोकांना एक चिप असलेला ई-पासपोर्ट मिळेल.
परराष्ट्र मंत्री म्हणाले की, "पासपोर्ट सेवा लवकरच लोकांना विश्वासार्ह, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने पासपोर्ट सुविधा प्रदान करेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय तंत्राचा वापर नवीन चिप्ससह प्रगत आणि अपग्रेडेड पासपोर्ट तयार करण्यासाठी देखील केला जाईल."
ई-पासपोर्ट कार्यक्रम २.० अंतर्गत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पासपोर्ट बनवले जातील. यामध्ये अद्ययावत बायोमेट्रिक्स तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे पासपोर्ट मिळवणे सोपे होणार असून युजरचा डेटाही सुरक्षित राहणार आहे. ई-पासपोर्टसाठी लागणारे सॉफ्टवेअर आयआयटी कानपूर आणि एनआयसीने विकसित केले आहे.