नेताजी हयात असते तर देशाची फाळणी झाली नसती : एनएसए अजित डोवाल

    17-Jun-2023
Total Views | 68
Ajit Doval on Subhash Chandra Bose

नवी दिल्ली : नेताजींनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी कधीही तडजोड केली नव्हती. नेताजी सुभाषचंद्र बोस हयात असते, तर देशाची फाळणी कधीही झाली नसती, असे प्रतिपादन देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी शनिवारी केले. नेताजी सुभाषचंद्र बोस स्मारक आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
 
नेताजींनी स्वातंत्र्याची भीक न मागता इंग्रजांशी लढा दिला. नेताजी हयात असते तर देशाची फाळणी कधीही झाली नसती. जिना यांना देखील त्यांचे नेतृत्व स्वीकारार्ह होते. नेताजींच्या महान प्रयत्नांवर कोणीही शंका घेऊ शकत नाही, महात्मा गांधी देखील त्यांचे प्रशंसक होते. परंतु लोक अनेकदा तुमच्या निकालांवरून तुमचा न्याय करतात. त्यामुळे सुभाषचंद्र बोस यांचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले, असे कोणीही म्हणून नये. इतिहासाने त्यांच्यासोबत अन्याय केला. आता मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा देदीप्यान इतिहास पुन्हा मांडत असल्याचेही एनएसए अजित डोवाल म्हणाले.

नेताजींनी आयुष्यात अनेक वेळा धैर्य दाखवले आणि महात्मा गांधींना आव्हान देण्याचे धाडसही त्यांच्यात होते. तेव्हा महात्मा गांधी त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या शिखरावर होते. त्यानंतर बोस यांनी काँग्रेस सोडली होती. परंतु भारतीय इतिहास आणि जागतिक इतिहासामध्ये अशा लोकांमध्ये फारच कमी साम्य आहे ज्यांच्यात ज्वलंत विरुद्ध जाण्याचे धैर्य होते आणि ते सोपे नव्हते. देशातील लोकांची राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक मानसिकता बदलण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली होती, असे एनएसए डोवाल यांनी यावेळी नमूद केले.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121