रत्नागिरीतील कासव पोहोचलं केरळात

    10-Jun-2023
Total Views | 52


satellite turtle




मुंबई (प्रतिनिधी):
कोकण किनारपट्टीवर सॅटेलाईट टॅग केलेले बागेश्री हे कासव आता प्रवास करत केरळात जाऊन पोहोचलं आहे. केरळच्या किनारी भागाकडे हे कासव वळले असुन ते प्रसिद्ध कोल्लम समुद्रकिनाऱ्यापासुन सुमारे ७५ किमी अंतरावर आहे.


रत्नागिरीतील गुहागर या समुद्रकिनाऱ्यावर बागेश्री आणि गुहा या दोन ऑलिव्ह रिडले कासवांना फेब्रुवारी महिन्यात टॅग करण्यात आले होते. महाराष्ट्र कांदळवन कक्ष, महाराष्ट्र वन विभाग आणि वाईल्डलाईफ इन्सिट्युट ऑफ इंडिया यांच्या सम्नवयाने समुद्री कासवांचा अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातुन ही कासवे टॅग करण्यात आली होती. भारताच्या पुर्व किनारपट्टीवर आढळणाऱ्या ही कासवे विणीचा हंगाम संपल्यानंतर नक्की जातात तरी कुठे, कोणत्या मार्गाने प्रवास करतात आणि किती लांब प्रवास करु शकतात या सगळ्याचा म्हणजेच त्यांच्या एकुण अधिवासाचा अभ्यास करता येईल यासाठी या कासवांना टॅग करण्यात आले होते.





tutle tagging



यानंतर सातत्याने गुहा आणि बागेश्री या दोन्ही कासवांच्या हालचालींचे निरिक्षण केले गेले असुन समाज माध्यमांवर ते वेळोवेळी प्रसिद्ध ही करण्यात आले आहे. रत्नागिरीतील बागेश्री ही केरळात दाखल झाली असुन गुहा कर्नाटकच्या खोल पाण्यात शिरली असुन ती हळुहळु दक्षिणेच्या दिशेने जात आहे.



अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121