"धर्मवीर" चित्रपटाची वर्षपूर्ती ; प्रसादने केली आगामी चित्रपटाची घोषणा

    13-May-2023
Total Views | 412
dharamveer cinema one year complete

मुंबई
: धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनप्रवासावर आधारित " धर्मवीर - मुक्काम पोस्ट ठाणे" या चित्रपटाला प्रदर्शित होउन दि. १३ मे रोजी एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने अभिनेते प्रसाद ओक यांनी जनतेचे आभार मानले. चित्रपटाला मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल त्यांनी जनतेला धन्यवाद दिले. यानिमित्ताने प्रसाद ओकने नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपट दुसरा तिसरा कुठला नसून "धर्मवीर" चित्रपटाचा दुसरा भाग आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाला मिळालेल्या उत्सफूर्त प्रतिसाद येणाऱ्या नव्या भागालासुध्दाला मिळावा अशी आशा प्रसाद ओक यांनी यावेळी व्यक्त केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी "धर्मवीर" च्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत. तसेच महाराष्ट्रातील रसिकांनी या चित्रपटाला उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल जनतेचे आभार मानले. चित्रपटाला अनेक पुरस्कारदेखील प्राप्त झाले आहेत. धर्मवीर आनंद दिघेंच्या स्मृतीस अभिवादन करत मुख्यमंत्र्यांनी रसिकांचे आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत.

"दिघे साहेब, असेच आमच्या पाठीशी राहा" अशी भावनिक साद अभिनेते प्रसाद ओक यांनी यावेळी घातली. तसेच त्यांनी पोस्टद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेता मंगेश देसाई यांचेदेखील आभार त्यांनी मानले. दरम्यान हा चित्रपट आनंद दिघे यांच्या जीवनप्रवासावर आधारलेला होता. त्यांची राजकीय कारकीर्द या चित्रपटाच्या माध्यमातून जनतेसमोर दाखविली गेली.



अग्रलेख
जरुर वाचा
मुंबई मेट्रो-३

मुंबई मेट्रो-३ 'बीकेसी ते आचार्य अत्रे' मार्गाचे लोकार्पण

कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे' मेट्रो ३ मार्गिकेतील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक, वरळी अशा टप्पा २ अच्या संचलनाची प्रतीक्षा अखेर आता संपली आहे. या मार्गिकेसाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस)कडून टप्पा २ अ ला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे या टप्प्याच्या संचलनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार, आज दि.९ रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मेट्रो ३च्या या टप्प्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री बीकेसी ते सिद्धिविनायक मंदिर स्थानकापर्यंत मेट्रोने ..

मसूद अजहरचा भाऊ जैशचा दहशतवादी अब्दुल रौफ अझहर ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ठार!

मसूद अजहरचा भाऊ जैशचा दहशतवादी अब्दुल रौफ अझहर ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ठार!

पहलगाम हल्ल्या नंतर भारताने पाकिस्तानी दहशतवाद्यांना जबरदस्त उत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’ पूर्ण केले. दि. ७ मे रोजी रात्री १ वाजून ४ मिनिटांनी ते दीड वाजताच्या दरम्यान ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाले. भारतीय दलांनी पाकिस्तानमध्ये बहावलपूर आणि मुरीदके येथे हल्ले केले आणि जैश आणि लष्करचे मुख्यालय उद्ध्वस्त केले. कित्येक वर्षांपासून या दोन्ही दहशतवादी संघटना सातत्याने भारताविरोधात कारवाया करत आहेत. हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद प्रमूख मसूद अझहरचा भाऊ अब्दुल रौफ अझहर जो जैश-ए-मोहम्मदचा ऑपरेशनल प्रमुख आणि आयसी-८१४ अपहरणाचा मास्टरमाइ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121