संविधान रक्षणासाठी 'वज्रमूठ' सभा... - संजय राऊत

    01-May-2023
Total Views | 56
sanjay raut

मुंबई
: आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाविकास आघाडीने वज्रमूठ सभेचे आयोजन केले आहे. वांद्रे कुर्ला संकुलात वज्रमुठ सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना ठाकरे गट प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटले, आजची वज्रमुठ सभा ही संविधान आणि महाराष्ट्र संरक्षणासाठी आयोजित केली आहे. तसेच, पंतप्रधान आणि गृहमंत्री यांचे देशाच्या संविधानावर नव्हे, तर ' मन की बात' वर प्रेमवर असल्याचे राऊतांनी म्हटले आहे.

'मन की बात'वर प्रेम करण्यापेक्षा संविधानावर प्रेम केले असते तर आजची परिस्थिती उद्भवली नसती, असेही राऊत यावेळी म्हणाले. महाराष्ट्र दिनाला सभा आयोजित करुन महाराष्ट्र संरक्षण आणि संविधान संरक्षणासाठी महाविकास आघाडी प्रयत्न आहे. दरम्यान, बीकेसीतील वज्रमुठ सभेला महाविकास आघाडीचे नेते हजर असणार आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे हे सबोधित करणार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड आणि छगन भुजबळ यांची भाषणे होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्यावतीने भाई जगताप आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना वज्रमुठ सभेला संबोधित करता येणार आहे.



अग्रलेख
जरुर वाचा
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

Tahawwur Rana काँग्रेस नेतृत्वाखालील असणाऱ्या युपीए सरकारला सत्तेतून बाहेर जाऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विरोधक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए सरकारच्या प्रत्येक कामाचे श्रेय हे स्वत:घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून युपीए सरकारच्या शासनकाळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संबंधित दहशतवाद्याचे प्रत्यार्पित करण्यात आले. मात्र, याचे सर्व श्रेय हे काँग्रेस घेत असल्याच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121