भारत हा मोदी-सावरकरांचा नाही तर नेहरू-गांधींचा देश : प्रणिती शिंदे

    26-Apr-2023
Total Views | 39

(Praniti Shinde)

भारत हा मोदी-सावरकरांचा नाही तर नेहरू-गांधींचा देश : प्रणिती शिंदे

मुंबई : भारत हा सावरकरांचा नव्हे, गांधी-नेहरूंचा देश आहे. असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केलं आहे. वीर सावरकर यांच्याविषयी माझ्या मनातही आदर होता. मात्र मी ‘सहा सोनेरी पानं’ हे पुस्तक वाचलं आणि माझं मत बदललं. असं वक्तव्य करुन नवीन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न प्रणिती शिंदेनी केला आहे.
सोलापूरच्या पत्रकार परिषदेत बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, "सावरकर यांच्या 'सहा सोनेरी पाने' हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्या मनात सावरकरांबद्दल शंका निर्माण झाली. सावरकरांबद्दल माझ्या मनातही आदर होता. मात्र, त्यांचे सहा सोनेरी पाने हे पुस्तक वाचल्यानंतर आपण सगळे शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानता. त्यांच्या सहा सोनेरी पाने या पुस्तकात सावरकरांनी महाराजांबाबत अपमान केला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलही त्यांनी अपशब्द लिहिले आहेत.'मोदीजी तुम्ही कितीही प्रयत्न करा हा देश नेहरू गांधींचाच असेल, मोदी सावरकरांचा कधीच नसेल." असे प्रणिती शिंदे म्हणाल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या शिवानी वडेट्टीवार यांनी सावरकरांबाबत वक्तव्य केलं होते. शिवानी म्हणाल्या होत्या की, "बलात्कार हे राजकीय हत्यार आहे, अशा विचारांचं सावरकरांनी समर्थन केलं. हे लोक फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर कधीच मोर्चा काढणार नाहीत. तर सावरकरांवर मोर्चा काढतात. सावरकरांचे विचार होते, बलात्कार हे राजकीय हत्यार आहे."
 
अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121