राहुल गांधींना संजय राऊतांना झापलं...

    27-Mar-2023
Total Views | 81
 
sanjay raut
 
 
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावद्दल उबाठा गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी यांनी राहुल गांधी यांना सुनावलेले खडे बोल म्हणजे फिक्सिंग मॅच होती, अशी टीका सत्ताधारी पक्षाकडून करण्यात येतेय. दरम्यान, यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "तुमचा जुगार सुरु ठेवा. आमची भुमिका स्पष्ट आहे."
 
"वीर सावरकरांचा अपमान आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाहीत. या विषयावर मी लवकरच राहुल गांधी यांची भेट घेणार आहे. आमचा पक्ष आम्हाला माहिती आहे. मालेगावात झालेल्या विराट सभेने आमचा पक्ष काय आहे, हे दाखवून दिलंय. महाराष्ट्रात तुमचंच जे मॅच फिक्सिंग चाललंय, जो जुगार सुरु आहे, तो चालू ठेवा." असं राऊत यांनी म्हणाले.
 
"सावरकर हे श्रद्धेचा विषय आहेत. ते नेहमीच राहतील. ज्या प्रकारे त्यांनी देशासाठी शिक्षा भोगली आहे. जेलमध्ये जाऊन आले आहेत. आता ती व्यक्ती जिवंत नाही. सावरकर जिवंत असते तर आपलं म्हणणं मांडू शकले असते. अशा व्यक्तीवर चिखलफेक केल्यास महाराष्ट्रातील जनता करारा जवाब देऊ शकते. तुमच्या सगळ्याच लढायात आम्ही सोबत असू पण सावरकरांकडूनच आम्हाला लढण्याची प्रेरणा मिळते. सावरकरांच्या बाबतीत आम्ही सातत्याने भूमिका स्पष्ट केली आहे. जयराम रमेश यांच्याशीही बोललो. लवकरच मी दिल्लीत जाणार आहे. राहुल गांधींची भेट घेऊन चर्चा करेन."
 
नाशिकचे शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी उद्धव ठाकरे यांचीच नार्को टेस्ट करा, कोणत्या कंपनीकडून ठाकरे यांनी किती पैसे घेतले, हे समोर येईल, असं वक्तव्य केलंय. त्यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, "ज्यांच्या कांद्याला ५० कोटीचा भाव घेतला ते असं म्हणतायत. पण इकडे शेतकरी कांद्याच्या भावासाठी रडतोय, हे आधी पहा. मालेगावच्या सभेने जनता कुणाची नार्को टेस्ट करणार हे उघड झालंय."
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121