भूकंपबळींची संख्या ६ हजारांवर

    08-Feb-2023
Total Views | 119
earthquake in Turkey

इस्तंबूल : तुर्कस्तानला गेल्या २४ तासांत पाच वेळा भूकंपाचा धक्का बसला असून, त्यात सहा हजारांवर नागरिकांचा मृत्यू झाला, तर ढिगार्‍यांखाली अडकलेल्यांची संख्या हजारोंवर असल्याने मृतांची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे.


तुर्कस्तान आणि सीरियामध्ये भूकंपाचे गेल्या दोन दिवसांत ५ धक्के बसले आहेत. यात ५ हजार २०० जणांचा मृत्यू झाला असून २० हजाराच्यावर जखमी आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने मृतांची संख्या २० हजारांपेक्षा अधिक असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.


turkey earthquake india help


भारताकडून मदतीचा ओघ


तुर्कीमध्ये एकापाठोपाठ एक झालेल्या पाच भूकंपामुळे मोठा हाहाकार उडाला आहे. या दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. तुर्की सरकारच्या मदतीने भारताने वैद्यकीय पथकासह ‘एनडीआरएफ’चे पथक भूकंपग्रस्त भागात पाठवले आहेत. भारतातून तेथे दोन बचावपथके पाठवण्यात आली आहेत. या बचाव पथकांसोबत एक डॉक्टरांची टीमदेखील आहे.



पाकिस्तानची आगळीक सुरूच


स्वतःला तुर्कस्तानचा जवळचा मित्र म्हणवून घेणार्‍या पाकिस्ताने तुर्कीच्या मदतीसाठी भारताने पाठवलेल्या विमानाला एअर स्पेस वापरण्याची परवानगी दिली नाही. मदतकार्यासाठी तुर्कस्तानला जाणार्‍या भारतीय विमानाला हवाई क्षेत्र देण्यास पाकिस्तानने नकार दिला आहे. पाकिस्तानच्या या असंवेदनशीलतेवर टीका केली जात आहे. 




पंतप्रधान मोदी झाले भावूक


तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भीषण भूकंपामुळे तेथे मोठा विध्वंस झाला आहे. या भूकंपाबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले असून या भूकंपानंतर त्यांना गुजरातमधल्या भूजमध्ये झालेल्या भूकंपाची आठवण झाली. या भूकंपातही हजारो लोकांचे बळी गेले होते. भाजप खासदारांच्या बैठकीत मोदी त्यांनी २००१ च्या भूज भूकंपाची आठवण काढली. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते.



अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121