ऑपरेशन दोस्त : प्रत्येक भारतीयांचं उर भरून येईल असा क्षण! Video

तुर्की भुकंप : ‘ऑपरेशन दोस्त’ पूर्ण, भारतीय पथक मायदेशी

    20-Feb-2023
Total Views | 219
Operation Dost



नवी दिल्ली
: भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन दोस्त’ अंतर्गत तुर्कीमधील भूकंपग्रस्तांसाठी मदत आणि बचाव कार्यात गुंतलेले राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) शेवटचे पथक भारतात परतले आहे.




परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट करून याची माहिती दिली. ते म्हणाले, ९९ सदस्यीय पथकाने इस्केंडरन येथे ३० खाटांचे पूर्ण सुसज्ज फील्ड हॉस्पिटल यशस्वीरित्या स्थापित केले आहे आणि चालवले आहे. यामुळे आपत्तीग्रस्त तुर्कीस मोठा दिलासा मिळाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Operation Dost



तुर्की आणि सिरियामध्ये ६ फेब्रुवारी रोजी ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भुकंप आला होता. त्यामध्ये जवळपास ४५ हजार लोकांचा मृत्यू झाला तर दहा लाखांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले होते. या भयावह संकटाच्यावेळी तुर्की आणि सिरिया येथे सर्वप्रथम मदत पोहोचविणाऱ्यांमध्ये भारताचा समावेश होता.



दोन्ही देशांमध्ये पीडितांना मदत करण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन दोस्त’ सुरू केले. भारताने तुर्की आणि सीरियाला मोठ्या प्रमाणात मदत सामग्री पाठवली आणि फिरते रुग्णालय चालवले. तुर्की आणि सीरियातील सर्वाधिक प्रभावित भागात भारतीय लष्कराचे अडीचशे सैनिक तैनात करण्यात आले होते.





दरम्यान, सातत्याने भारतविरोधी भूमिका घेऊन पाकिस्तानची तळी उचलणाऱ्या तुर्कीस संकटाच्या वेळी भारताने सर्वप्रथम मदत पाठवून ‘वसुधैव कुटुंबकम्’ या आपल्या धोरणाचा पुन्हा परिचय करून दिला होता.

अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121