'वंदे भारत एक्सप्रेस' महाराष्ट्राच्या विकासाचं एक प्रतिक! : पंतप्रधान
10-Feb-2023
Total Views | 79
15
(Vande Bharat Express)
मुंबई (Vande Bharat Express) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या दोन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवला. "वंदे भारत एक्सप्रेस देशाच्या तसेच महाराष्ट्राच्या विकासाचं एक प्रतिक असून राज्यात सुरु झालेल्या दोन वंदे भारत ट्रेनमुळे राज्यातील पर्यटन आणि तीर्थक्षेत्राला चालना नक्कीच मिळेल. त्यामुळे आजचा दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे.", असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. सीएसएमटी येथे आयोजित करण्यात आलेल्या वंदे भारतच्या लोकार्पण सोहळ्यादरम्यान ते बोलत होते.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. ते म्हणाले, "देशात मोठ्या गतीने एकूण १० वंदे भारत सुरु झाल्याने रेल्वे क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे. महाराष्ट्रात सुरु झालेल्या वंदे भारतचा विद्यार्थी, व्यापारी आणि पर्यटकांना मोठा फायदा होणार आहे. आजवर १७ राज्यांतील १०८ जिल्हे वंदे भारतने जोडले. महाराष्ट्रातल्या रेल्वेसाठी बजेटमध्ये मोठी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आजचा दिवस मबाराष्ट्रासाठी महत्त्वाचा असून डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्रात विकास वाढेल. राज्यात पर्यटन व तीर्थक्षेत्राला चालना मिळेल."