"उद्धव ठाकरे आणि राऊत आता फक्त आयुष्यभर EVMचा जप करत बसा!"

किरीट सोमय्यांचा उबाठा गटाला टोला

    06-Dec-2023
Total Views | 50

Somaiya
मुंबई : आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना आयुष्यभर ईव्हीएमचा जप करावा लागणार आहे, असा टोला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लगावला आहे. तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला विजय मिळाल्यानंतर ईव्हीएमचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात येत होता. तसेच एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले होते. यावर आता किरीट सोमय्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
 
किरीट सोमय्या म्हणाले की, "आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना आयुष्यभर ईव्हीएमचा जप करावा लागणार आहे. ठाकरे साहेब २०१८ ला याच चार राज्यांमध्ये भाजप पराभूत झाले होते. त्यावेळी ईव्हीएमच होतं. तसेच २०१९ लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आपले आमदार-खासदार निवडून आले तेव्हादेखील ईव्हीएमच होतं. त्याच आमदारांच्या आधारे आपण मुख्यमंत्री झाला होतात. ये मोदी की गॅरंटी है. लोकांना मोदींवर विश्वास आहे आणि विश्वासघातकी उद्धव ठाकरे सेना ही आता इतिहासजमा होणार," असे टोला त्यांनी लगावला आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121