साताऱ्यातील शिरवळमध्ये 'पाईड व्हिटइअर'चे दुर्मिळ दर्शन

महाराष्ट्रातील पहिलीच नोंद

    30-Dec-2023   
Total Views | 142

pied wheatear
मुंबई (विशेष प्रतिनिधी): साताऱ्यातील शिरवळ गावाजवळ असलेल्या एका शेतामध्ये पाईड व्हिटइअर या स्थलांतरित पक्ष्याचे दुर्मिळ दर्शन झाले आहे. या पक्ष्याचे दुर्मिळ दर्शन पक्षीनिरिक्षक वैभव पाटील, हरीश पाटील आणि सुरेंद्र पाटील या तिघांना रविवार दि. २४ डिसेंबर रोजी झाले आहे. या पक्ष्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच नोंद आहे. 


pied wheatear


थ्रश कुळातील हा पक्षी युरोप ते आफ्रिका आणि आग्नेय आशिया या भागात स्थलांतराचा प्रवास करणारा असून तो भटकुन महाराष्ट्रात आल्याची शक्यता पक्षीनिरिक्षकांनी वर्तवली आहे. पाईड व्हीटइअर या पक्ष्याच्या भारतात लडाख, पश्चिम बंगाल, गोवा, कर्नाटक अशा मोजक्याच नोंदी आहेत. वैभव पाटील, हरीश पाटील आणि सुरेंद्र पाटील हे रायगड जिल्ह्यातील पक्षीनिरिक्षक असून बहाराई फाउंडेशनमार्फत गेली काही वर्ष पर्यावरणाशी संबंधीत कामे करत आहेत.


pied wheatear


यापूर्वी रायगड जिल्ह्यात रेड क्रेस्टेड पोचर्ड आणि कॉमन क्वेल या पक्ष्यांची पाहिली नोंद केली आहे. इ-बर्ड या पक्षीनिरिक्षण नोंदींच्या अॅप वर रायगडमधून तिघांनीही सर्वाधिक नोंदी केल्या आहेत. सतत प्रवास करणारा पक्षी असल्यामुळे तो एकाच ठिकाणी आढळत नाही.


समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड. 
अग्रलेख
जरुर वाचा
भारताचा आर्थिक कायापालट : निर्णायक नेतृत्वाने घडवलेले नवे पर्व

भारताचा आर्थिक कायापालट : निर्णायक नेतृत्वाने घडवलेले नवे पर्व

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (खचऋ) एप्रिल 2025च्या ताज्या अहवालाने प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमानाची आणि आत्मविश्वासाची एक नवी ज्योत प्रज्वलित केली आहे. या अहवालानुसार, भारताने 4.187 ट्रिलियन डॉलर्सच्या सकल राष्ट्रीय उत्पादनासह (ॠऊझ) जपानसारख्या विकसित अर्थव्यवस्थेला मागे टाकत, आज जगातील चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपले नाव कोरले आहे. हे ऐतिहासिक यश म्हणजे, केवळ आकड्यांचा खेळ नसून, ते एका दूरदर्शी नेतृत्वाने, दृढ राजकीय इच्छाशक्तीने आणि सव्वाशे कोटी भारतीयांच्या एकत्रित प्रयत्नांनी गेल्या दशकात ..

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट मोडवर! मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्देश

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट मोडवर! मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्देश

(CM Devendra Fadnavis Reviews Maharashtra Security Amid India-Pak Tensions)भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. ९ मे रोजी राज्यातील एकूण सुरक्षा व्यवस्थेचा आणि आपत्कालीन तयारीचा सखोल आढावा घेतला. मुंबईतील वर्षा निवासस्थानी घेतलेल्या या उच्चस्तरीय बैठकीत राज्याच्या गृह, आरोग्य, पोलिस, प्रशासन, आणि महापालिकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चर्चा झाली. संभाव्य संकट परिस्थितीत नागरिकांचा जीवित व मालमत्तेचा धोका कमी करणे आणि प्रशासन सज्ज ठेवणे यावर भर ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121