काशीतील मुस्लिम कुटुंबांनी दिली राम मंदिरासाठी देणगी!

    27-Dec-2023
Total Views | 45
 muslim donation ram mandir 
 
लखनौ : काशी प्रांतातील साधारण २२ कुटुंबांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी देणगी दिली आहे. यापैकीच एका परिवारातील इकरा अन्वर खान या वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या मुलीने २०२१ मध्ये राम मंदिराच्या उभारणीसाठी ११,००० रुपयांची देणगी दिली होती. अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय महामंत्री स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी एबीपी न्युज या वृत्तवाहीनीशी बोलताना ही माहीती दिली. इकरा अन्वर खानने आपल्या हातावर जय श्री रामही लिहले आहे.
 
 
 
"२०२१ मध्ये अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी, सर्व वर्गातील लोकांना या ऐतिहासिक वारसा आणि प्राचीन वारशाशी कायमचे जोडण्याच्या उद्देशाने सामूहिक समर्पण निधीचे काम केले जात होते आणि आजपर्यंत देशभरातून हजारो लोकांनी यात योगदान दिले. ज्यामध्ये विविध धर्माच्या लोकांचाही समावेश आहे". असे स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी म्हटल आहे.
 
श्रीराम मंदीराच्या उद्घाटनासाठी देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीराममंदीर उभारण्यासाठीचा निधीही जनतेतुनच जमा करण्यात आला होता. आताही सर्वजण उत्साहाने आपापल्यापरीने राम मंदिरासाठी काहीना काही करत आहेत. २२ जानेवारीला अयोध्येत रामलल्लांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. व २५ जानेवारीपासुन मंदीर दर्शनासाठी खुले केले जाणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधांन नरेंद्र मोदी उपस्थीत राहणार आहेत. त्याचबरोबर देशभरातुन अनेक मान्यवर ही उपस्थीत राहणार आहेत. 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis शेतीसाठी 'एआय' वर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून, कृषी विभागाच्या सर्व योजना एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी ॲप व संकेतस्थळ विकसित करावे. कृषीमधील स्टॉर्टअपला प्रोत्साहन देवून नवकल्पना विकसित करण्यासाठी कृषी विभागाने प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या भेटीत राज्यातील कृषी क्षेत्रात सहकार्य करण्यास ते इच्छुक असल्याचे त्यांनी असल्याचेही असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले...

बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्या पुतण्यावर किरकोळ कारणावरून गोळीबार

बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्या पुतण्यावर किरकोळ कारणावरून गोळीबार

Bihar मधील भगलापूमधून मोठी बातमी समोर आली आहे. बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंतर राय यांच्या पुतण्यावर गोळीबार करत हत्या करण्यात आल्याची दुर्देवी घटना घडली आहे. पाण्यावरून झालेल्या वादातून दोन भावांनी गोळीबार केला असल्याचे सांगण्यात येत असून ज्यात भाऊ जगजीतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दुसरा भाऊ आणि त्याच्या आईलाही गोळ्या लागल्याने जखमी झाल्याचे वृत्त आहे. नवगछियामधील परबट्टा पोलीस ठाणअंतर्गत गजगतपूर गावात ही घटना घडली आहे. मृत आणि जखमी हे नित्यानंद हे चुलत भावाची मुलं आहेत...

महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या, जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी

"महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या", जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी

MLA MT Krishnappa कर्नाटक राज्यातील जनता दलाचे आमदार एमटी कृष्णाप्पा यांनी विधानसभेत बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्या विधानाने ते पुन्हा एकदा नकारात्मक दृष्टीकोन घेऊन प्रकाशझोतात आले आहेत. काही राज्यांमध्ये महिलांना संबंधित राज्य सरकार प्रतिमहा २ हजार तर महाराष्ट्र राज्यात लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून १५०० रुपये दिले जात आहेत. यावरून कर्नाटकातील पुरूषांना का काही नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जर महिलांना पैसे तर पुरूषांनाही मद्य दिले जावे, असे बेताल वक्तव्य एमटी कृष्णाप्पा यांनी केले ..