प्रमोद चित्ते यांनी मुलींचे लग्न साधेपणाने करीत शैक्षणिक संस्थेला दिला मदतीचा हात

त्यांनी लग्नावर उधळपट्टी करणाऱ्यांना घालून दिला आदर्श

    01-Dec-2023
Total Views | 33
 

madat photo 


डोंबिवली : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक मोठा सोहळा असतो. त्यामुळे हा सोहळा मोठया थाटामाटात पार पडावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. लग्न थाटामाटात होत असताना खर्च ही तसाच होतो. पण लग्न थाटामाटात करून त्यावर खर्च करण्यापेक्षा काही रक्कमेचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी करण्याचे काम डोंबिवली नजीक असलेल्या लोढा हवन मधील प्रमोद चित्ते यांनी केले आहे. प्रमोद चित्ते यांच्या ज्येष्ठ कन्या पल्लवी हिचा विवाह साधेपणाने करीत त्यांनी 50 हजार रूपयांचा धनादेश नवी मुंबईमधील सुख सुमन सामाजिक व शैक्षणिक संस्थेला दिला आहे. यावरून लग्नावर अवाढव्य खर्च करणाऱ्यांसाठी प्रमोद यांनी एक चांगला आदर्श घालून दिला आहे.


डोंबिवली नजीक च्या लोढा हवन परिसरात राहणारे प्रमोद चित्ते यांच्या ज्येष्ठ कन्या पल्लवी यांचा विवाह मंगळवारी पाटीदार भवन येथे संपन्न झाला. प्रमोद हे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून खाजगी शिकवणीच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे ज्ञानदानाचे काम करीत आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षणाविषयी त्यांच्यात विशेष ओढ आहे. सुख सुमन सामाजिक संस्था ठाणे जिल्हासह मुंबईत काम करीत आहेत. सध्या संस्था नवी मुंबई, मुंबई,ठाणे, रायगड याठिकाणी काम करीत आहे. शिक्षणाच्या जुन्या पध्दती आहेत आणि नवीन पध्दतीचा मेळ घालून मुलांना कसे विकसित करता येईल हे पाहिले जात आहे. या संस्थेचा संपूर्ण महाराष्ट्रभर काम करण्याचा मानस आहे. ही संस्था स्र्वखर्चाने आपले काम करीत आहे. पण अनेक जण स्वत:हून आर्थिक मदत करतात. संस्था त्या सर्वाचे स्वागत करीत असल्याची भावना संस्थेचे संचालक चिमाजी उरसळ यांनी व्यक्त केली.


प्रमोद चित्ते यांनी सांगितले, पल्लवी ही ज्येष्ठ कन्या आहे. आणखी दोन मुली असून त्यांच्या लग्नात ही सामाजिक संस्थेला मदत करणार आहे. त्यावेळी कदाचित या पेक्षा मोठय़ा रक्कमेचा धनादेश दिला जाईल. पल्लवीच्या लग्नानिमित्त सुख सुमन या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणा:या संस्थेला 50 हजार रूपयांची मदत केली आहे. शैक्षणिक क्षेत्रात सध्या मागासलेपणा आला आहे. तो कुठेतरी थांबवा. लहानपणापासून मोठय़ांना मराठी भाषा शुध्द यावी. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषेवर विद्याथ्र्यानी प्रभूत्व मिळावे या उद्देशाने शैक्षणिक क्षेत्रात काम करणा:या संस्थेला मदत करीत आहे. या संस्थेचे कार्य जिथे शाळा नाही तिथे गावांनी त्यांना जागा द्यावी. संस्था त्याठिकाणी शाळा बांधते आणि मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे सुख सुमन संस्थेची निवड केली आहे असे ही त्यांनी सांगितले.


दरम्यान भाजपाचे ग्रामीण मंडळ सरचिटणीस रविंद्र पाटील आणि धर्मराज फाऊंडेशनचे महेंद्र पाटील यांच्यासह नववधू पल्लवी आणि तिचे पती अमेय यांच्या हस्ते संस्थेला धनादेश सुपुर्द करण्यात आला. यावेळी संस्थेच्या वतीने चिमाजी उरसळ यांच्यासह त्यांची टीम उपस्थित होती.
 

-----------------------------------------------------------
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लालू प्रसाद यांचा मुलगा तेज प्रतापचा बिहार पोलिसांनी मोडला माज, विना हेल्मेट प्रवास केल्याने फाडले चलन

लालू प्रसाद यांचा मुलगा तेज प्रतापचा बिहार पोलिसांनी मोडला माज, विना हेल्मेट प्रवास केल्याने फाडले चलन

Tej Pratap Yadav जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादवचे थोरले पुत्र आणि माजी मंत्री तेज प्रताप यादव यांच्यावर बिहार पोलिसांनी कारवाई दाखल केली आहे. त्यांनी विनाहेल्मेटचा वापर करत दुचाकी वाहन चालवल्याने पाटणा पोलिसांनी दंडत्मक कारवाई केली आहे. एवढेच नाहीतर ज्या पोलिसाला धुलीवंदना दिवशी नाचण्यास भाग पाडले होते त्यानाही त्या ठिकाणी उपस्थि राहण्यास सांगितले. पटणाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजीव मिश्रा म्हणाले की, संबंधित अपमानित पोलिसाला त्या ठिकाणी हजर राहण्यास सांगितले होते. बिहार पोलिसांनी याविरोधात कारवाई ..