दिल्ली-एनसीआर आणि उत्तर प्रदेशमध्ये भूकंपाचे धक्के!

नेपाळमधील भूकंपात १५७ जणांचा मृत्यू

    06-Nov-2023
Total Views | 50
earthquake in delhi

नवी दिल्ली
: दिल्ली-एनसीआर आणि उत्तर प्रदेशमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ५.6 इतकी मोजली गेली आहे.तीन दिवसांत भूकंपाचे धक्के बसण्याची ही दुसरी वेळ आहे. दि.३ नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ६.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्याचे केंद्र नेपाळ होते आणि त्याचे हादरे दिल्लीपर्यंत जाणवले.

दि. ३ नोव्हेंबर रोजी झालेल्या या भूकंपात १५७ जणांना आपला जीव गमवावा लागला असून शेकडो घरांचे नुकसान झाले आहे. २०१५ मध्ये नेपाळमध्ये ७.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्यानंतर आलेल्या भूकंपामुळे सुमारे ९,००० लोकांचा मृत्यू झाला आणि २२ हजारांहून अधिक लोक जखमी झाले.

भूकंप झाल्यास काय करावे?

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण भूकंपांबाबत अलर्ट जारी करत आहे. यानुसार, हादरा बसल्यास घाबरू नका, शांत राहा आणि टेबलाखाली जा. आपले डोके एका हाताने झाकून ठेवा आणि थरथरणे थांबेपर्यंत टेबल धरा.


अग्रलेख
जरुर वाचा
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

Tahawwur Rana काँग्रेस नेतृत्वाखालील असणाऱ्या युपीए सरकारला सत्तेतून बाहेर जाऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विरोधक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए सरकारच्या प्रत्येक कामाचे श्रेय हे स्वत:घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून युपीए सरकारच्या शासनकाळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संबंधित दहशतवाद्याचे प्रत्यार्पित करण्यात आले. मात्र, याचे सर्व श्रेय हे काँग्रेस घेत असल्याच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121