संघटित गुन्हेगार आणि दहशतवाद्यांविरोधात भारत आक्रमक

    29-Nov-2023
Total Views | 49
Ministry of External Affairs Spokesperson Arindam Bagchi

नवी दिल्ली :
संघटित गुन्हेगार, सशस्त्र हल्लेखोर आणि दहशतवादी यांच्यातील संबंधाबाबत अमेरिकेने भारतास माहिती दिली असू त्याविरोधात कारवाई करण्यासाठी भारताने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली आहे.

गेल्या काही वर्षांत भारत आणि अमेरिका सुरक्षेच्या मुद्द्यावर एकत्र आले आहेत. दोन्ही देशांमध्ये परस्परांना सुरक्षेशी संबंधित गुप्तचर माहितीची देवाणघेवाण करणे आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर सहकार्य केले जात आहे. अमेरिकेने काही काळापूर्वी दिलेल्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या माहितीविषयी परराष्ट्र मंत्रालयाने माहिती दिली आहे.
 
परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, द्विपक्षीय सुरक्षा सहकार्याबाबत अमेरिकेसोबत झालेल्या चर्चेदरम्यान अमेरिकेने संघटित गुन्हेगार, सशस्त्र हल्लेखोर, दहशतवादी आणि इतर यांच्यातील संबंधाशी संबंधित काही माहिती सामायिक केली होते. ही माहिती दोन्ही देशांसाठी चिंतेचे कारण असून त्याविषयी आवश्यक पाठपुरावा करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी भारताने उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून समितीच्या निष्कर्षांच्या आधारे भारताकडून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असेही बागची यांनी म्हटले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
भारताचा आर्थिक कायापालट : निर्णायक नेतृत्वाने घडवलेले नवे पर्व

भारताचा आर्थिक कायापालट : निर्णायक नेतृत्वाने घडवलेले नवे पर्व

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (खचऋ) एप्रिल 2025च्या ताज्या अहवालाने प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमानाची आणि आत्मविश्वासाची एक नवी ज्योत प्रज्वलित केली आहे. या अहवालानुसार, भारताने 4.187 ट्रिलियन डॉलर्सच्या सकल राष्ट्रीय उत्पादनासह (ॠऊझ) जपानसारख्या विकसित अर्थव्यवस्थेला मागे टाकत, आज जगातील चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपले नाव कोरले आहे. हे ऐतिहासिक यश म्हणजे, केवळ आकड्यांचा खेळ नसून, ते एका दूरदर्शी नेतृत्वाने, दृढ राजकीय इच्छाशक्तीने आणि सव्वाशे कोटी भारतीयांच्या एकत्रित प्रयत्नांनी गेल्या दशकात ..

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट मोडवर! मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्देश

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट मोडवर! मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्देश

(CM Devendra Fadnavis Reviews Maharashtra Security Amid India-Pak Tensions)भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. ९ मे रोजी राज्यातील एकूण सुरक्षा व्यवस्थेचा आणि आपत्कालीन तयारीचा सखोल आढावा घेतला. मुंबईतील वर्षा निवासस्थानी घेतलेल्या या उच्चस्तरीय बैठकीत राज्याच्या गृह, आरोग्य, पोलिस, प्रशासन, आणि महापालिकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चर्चा झाली. संभाव्य संकट परिस्थितीत नागरिकांचा जीवित व मालमत्तेचा धोका कमी करणे आणि प्रशासन सज्ज ठेवणे यावर भर ..

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व मंत्री आशिष शेलारांच्या हस्ते आज नँन्सी डेपोच्या प्रवासी निवारा-नियंत्रण कक्षाचे उद्‌घाटन

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व मंत्री आशिष शेलारांच्या हस्ते आज नँन्सी डेपोच्या प्रवासी निवारा-नियंत्रण कक्षाचे उद्‌घाटन

भाजपा विधानपरिषद गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या विकास निधीतून उभारण्यात आलेल्या एस टी महामंडळाच्या बोरिवलीच्या पूर्व भागातील नँन्सी एसटी डेपोच्या प्रवासी निवारा व नियंत्रण कक्षाचे उद्‌घाटन उद्या शनिवार १० मे, २०२५ रोजी सायंकाळी ८.०० वाजता राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व मुंबई उपनगरचे पालकमंत्री तसेच माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्यमंत्री आ. आशिष शेलार यांच्या शुभ हस्ते होणार असल्याची माहिती आ. प्रविण दरेकर यांनी दिली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121