‘शिवशक्ती संगम’ची सूत्रे आणि संचालन

    25-Nov-2023
Total Views | 148
Ravindra Shingnapurkar on Motibag


पुण्यात तळजाईला २०१६ मध्ये विराट स्वरुपात झालेल्या ‘शिवक्ती संगम’चे नियोजन, पूर्वतयारी आणि सूत्रसंचालन हे मोतीबागेत कार्यालय स्थापन झाले होते. त्याच्या व्यवस्थापनात कैलास सोनटक्के यांच्यासह सह-महाव्यवस्थापक राहिलेल्या रवींद्र शिंगणापूरकर यांच्या आठवणी...

दि. १ ऑक्टोबर, २०१४ या दिवशी, दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी होणारी महानगर समन्वयाची बैठक संपल्यानंतर आपल्याला भेटायचे आहे, असे कैलासजी सोनटक्के यांनी सांगितले. बैठकीनंतर त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील स्वयंसेवकांच्या एकत्रीकरण कार्यक्रमाविषयी तसेच त्याच्या व्यवस्था विषयात मला सह-महाव्यवस्थापक म्हणून दायित्व स्वीकारता येईल का, असे विचारले.त्यानंतर या कार्यक्रमाच्या तयारीसाठी विविध बैठकांना सुरुवात झाली. ठिकाण होते, अर्थातच मोतीबागेतील बैठक कक्ष..या मोठ्या उपक्रमाच्या व्यवस्थेची पूर्वतयारी म्हणून आम्ही ‘देवगिरी संगम’ या कार्यक्रमाला उपस्थिती लावली व सर्व व्यवस्थांचा आढावा घेतला. या भेटीनंतर मोतीबागेमध्ये जानेवारी २०१६ मध्ये होणार्‍या ‘शिवशक्ती संगम’ची तयारी करण्यासाठी कार्यालयाची सुरुवात झाली. कैलासजी सोनटक्के, आनंद ओक, धनंजय काळे, बाळासाहेब दळवी, गिरीधारी बुचडे, राजाभाऊ कदम, रवी धुमाळ, डॉ. प्रवीण दबडघाव, अण्णा वाळिंबे, तसेच अन्य संघ अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठकांचे सत्र सातत्याने सुरू झाले.

पूर्वीच्या मोतीबागेत मुख्य द्वारातून आत प्रवेश केल्यावर डाव्या हाताला असणार्‍या जिन्यावरून वर गेल्यावर समोरच्या खोलीमध्ये ‘शिवशक्ती संगम’चे कार्यालय सुरू करण्यात आले. याच कार्यालयामध्ये ‘शिवशक्ती संगम’च्या प्राथमिक आराखड्याच्या बैठका झाल्या. १०० एकराचा प्रत्यक्ष कार्यक्रम परिसर, त्याला जोडून असणारा साधारणपणे २५० एकराचा सिद्धता केंद्राचा परिसर, त्याला जोडून वाहन तळासाठी आवश्यक असणारा २११ एकराचा परिसर, अशा विविध गोष्टींचा आराखडा त्याच ठिकाणी चर्चिला गेला आणि अंतिम करण्यात आला. त्या आराखड्याप्रमाणे आवश्यक असणार्‍या जागांची पाहणी करण्यासाठी पुण्याच्या विविध प्रवेश रस्त्यांवर जाऊन चाचणी करण्यात आली. पिरंगुट रस्ता, कात्रज रस्ता, हडपसर-मांजरी परिसर, नगर रस्ता, पुणे-मुंबई रस्ता अशा अनेक ठिकाणी या कार्यक्रमासाठी जागा पाहण्यात आली आणि अंतिमतः मारुंजी, मेरे व जांबे या तीन गावांच्या संगमाच्या ठिकाणी या कार्यक्रमासाठी स्थान नक्की करण्यात आले. हे स्थान नक्की झाल्यानंतर विविध खात्यांच्या योजना, प्रत्येक खात्याचे कामाचे स्वरूप, त्यासाठी असणार्‍या प्रमुख कार्यकर्त्यांच्या नावांची योजना, तसेच त्या खात्यामध्ये काम करणार्‍या अन्य कार्यकर्त्यांच्या नावाची योजना ही याच मोतीबागेच्या कार्यालयामध्ये निश्चित करण्यात आली.

सहा जणांची सुकाणू समिती त्यानंतर विविध ३५ खात्यांचे प्रमुख, सहप्रमुख आणि त्या प्रत्येक खात्यात विविध उपखाती व स्वयंसेवक अशी साधारणपणे आठ हजार जणांची जणू एक मोठी फौजच या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आली. मोतीबागेतील याच कार्यालयामधून या सर्व कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याची योजना तयार करण्यात आली. केशव सभागृह, माधव सभागृह, मोरोपंत पिंगळे सभागृह, रज्जूभैया सभागृह तसेच विविध बैठक कक्षांत त्यांच्या बैठक क्षमतेनुसार बैठकांचे, प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले. विविध बैठका जवळपास दिवसभर या मोतीबागेत सकाळी ८ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत सातत्याने चालू होत्या. तेथेच निर्णय होत होते, त्यानुसार अंमलबजावणी होत होती. आढावा घेतला जात होता, समस्या आल्यास मार्गही काढण्यात येत होता.दि. ३ जानेवारी, २०१६ रोजी ‘शिवशक्ती संगम’ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. त्यानंतर चार दिवस मैदानावरील सर्व गोष्टींची आवराआवर झाली. त्यानंतर सर्व साहित्याचा आणि उपक्रमांचा हिशोब करणे यासाठीच्या बैठका परत एकदा मोतीबागेच्या याच कार्यालयात अनुभवल्या. अशा रीतीने कार्यक्रमाचे पूर्व नियोजन, प्रत्यक्ष कामांची अंमलबजावणी आणि त्यानंतर कार्यक्रमाच्या सर्व हिशोबाची पूर्तता, या सर्व गोष्टी मोतीबागेतील कार्यालयामध्ये घडल्या.

या कालावधीत मोतीबागेत येणार्‍या सर्व स्वयंसेवक, कार्यकर्ते व अधिकारी यांची भोजन व्यवस्था ‘अन्नपूर्णा’ येथे चोख बजावली गेली. त्याबरोबरच याला साक्षीदार असणारे मोतीबागेतील सर्व निवासी स्वयंसेवक व अधिकारी हेसुद्धा या कामात सातत्याने सहभागी होते. मोतीबागेतील या सर्व व्यवस्थेने सर्वांची ऊर्जा सातत्याने वरच्या पातळीवर राहण्यास मदत झाली.सरसंघचालक, सरकार्यवाह, अ.भा.अधिकारी तसेच क्षेत्र व प्रांत अधिकारी यांच्याबरोबरच विविध बैठका, चर्चा व त्यातून मिळालले त्यांचे मार्गदर्शन हा व्यक्तिशः एक संस्मरणीय ठेवा आहे. नोव्हेंबर २०१४ ते एप्रिल २०१६ असा सुमारे १७ महिने मोतीबागेच्या कार्यालयातले वातावरण सातत्याने अनुभवता आले, सर्वांचा सहवास लाभला. हा सहवास जीवन समृद्ध करणारा आहे.

रवींद्र शिंगणापूरकर


अग्रलेख
जरुर वाचा
मेरठनंतर आता जयपूरमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला जाळले

मेरठनंतर आता जयपूरमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला जाळले

Extramarital Affairsठेवणारी काळीज हेलावून टाकणाऱ्या धक्कादायक घटनेनंतर जयपूरमध्ये पती -पत्नीच्या नात्याला काळीमा लावणारी घटना समोर आली आहे. जयपूरमध्ये एका महिलेचे प्रेमसंबंध असलेल्या परपुरूषाला तिच्या पतीचा खून केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर तिने आपल्या पतीचा मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी सांगितले की, भाजी विक्रेता धन्नलाल सैनी याला त्याच्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती मिळाल्यानंतर तिने प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीला जाळलं आहे...

आंतरराष्ट्रीय इन्फ्लूएन्सरचा सर्पमित्राच्या मदतीने सापांसोबत बेकायदा खेळ; वनमंत्र्यांच्या नवी मुंबईतील घटना

आंतरराष्ट्रीय इन्फ्लूएन्सरचा सर्पमित्राच्या मदतीने सापांसोबत बेकायदा खेळ; वनमंत्र्यांच्या नवी मुंबईतील घटना

भारतात आलेल्या आंतरराष्ट्रीय सोशल मिडिया इन्फ्लूएन्सरने मुंबईतील काही बोगस सर्पमित्रांच्या मदतीने सापांसोबत बेकायदा खेळ केल्याची घटना समोर आली आहे (handling protected snake). नवी मुंबईतील घणसोली येथे बोगस सर्पमित्रांनी या आंतरराष्ट्रीय इन्फ्लूएन्सरना साप हाताळण्यासाठी देऊन त्याचे व्हिडीओ सोशल मिडियावर प्रसारित केले (handling protected snake). यासंदर्भात ठाणे वन विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली असून वन विभागाकडून चौकशी सुरू आहे (handling protected snake). महत्त्वाचे म्हणजे सर्पमित्रांनी आंतरराष्ट्रीय इन्फ्ल..

केवळ दंगलखोरांना अटक करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी धुडकावला, हिंदू संघटनांच्या  आठ कार्यकर्त्यांना अटक

केवळ दंगलखोरांना अटक करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी धुडकावला, हिंदू संघटनांच्या आठ कार्यकर्त्यांना अटक

नागपूर दंगलीचे पडसाद आता देशात उमटू लागले आहेत. छत्रपती संभाजीनगरात असलेल्या मुघलशासक औरंगजेबाच्या कबरीवरून हिंसाचार झाल्याचे दिसून येत आहे. अशातच आता पोलिसांनी फहीम खानसोबत इतर ५१ जणांना अटक करण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. कुराणचे पान जाळल्याच्या एका अफवेमुळे निष्पाप विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे दंगलखोर कट्टरपंथींना आपल्याच लोकांना अटक करण्यात आली असे वाटत आहे. मात्र, पोलिसांनी कोणतीही तडजोड न करता आता हिंदूंना ..

चांदोलीतील खुंदलापूर धनगरवाड्याचे पुनर्वसन २८ वर्षांपासून रखडलेले - वनमंत्री संतापले

चांदोलीतील खुंदलापूर धनगरवाड्याचे पुनर्वसन २८ वर्षांपासून रखडलेले - वनमंत्री संतापले

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधील चांदोली राष्ट्रीय उद्यानातील खुंदलापूर धनगरवाड्याच्या पुनर्वसनासंदर्भात गुरुवार दि. २० मार्च रोजी वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत माहिती दिली (kundalpur relocation issue). हे गाव व्याघ्र प्रकल्पामधून वगळण्यासाठी पुढील एक महिन्याच्या आत राज्य वन्यजीव मंडळाची परवानगी घेऊन त्यासंदर्भातील प्रस्ताव राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे पाठवला जाईल, अशी खात्री त्यांनी दिली (kundalpur relocation issue) . तसेच हा प्रश्न गेल्या २८ वर्षांपासून रखडवल्यामुळे वन अधिकाऱ्यांवर ताशेरे देखील ओढले. ..