राष्ट्र उभारणीच्या कामाला सतत ऊर्जा देणारे पावनक्षेत्र

    25-Nov-2023
Total Views | 139
Moreshwar Joshi on Motibag
 
देशाला ‘परम वैभव’ मिळवून देण्यासाठी तेथे राहणार्‍या किंवा येऊन जाणार्‍या प्रत्येक व्यक्तीने पुण्यातील मोतीबाग संघकार्यालयाच्या जागेला मंत्राचे सामर्थ्य आणून दिले आहे.

एखाद्या ठिकाणाला पुण्यक्षेत्राचा किंवा ज्ञानपीठाचा दर्जा मिळतो, तो त्यावर तशा स्वरुपाच्या नावाची पाटी लावून नव्हे, तर तेथे सुरू असलेल्या कामावरून मिळतो. गेली ६५-७० वर्षे चारित्र्य संवर्धनाचे, राष्ट्र उभारणीचे आणि देशाला ‘परम वैभव’ मिळवून देण्यासाठी तेथे राहणार्‍या किंवा येऊन जाणार्‍या प्रत्येक व्यक्तीने पुण्यातील मोतीबाग संघकार्यालयाच्या जागेला मंत्राचे सामर्थ्य आणून दिले आहे. तेथे प्रांतातून गेली ५० वर्षे येत राहिलेल्या, अनेक जणांना कदाचित मोतीबागेचा घरनंबरही माहीत नसेल; पण तेथे पूजनीय श्रीगुरुजी, बाळासाहेब देवरस, प्रा. रज्जूभैय्या, श्रद्धेय मोरोपंत किंवा दत्तोपंत ठेंगडी यांच्या बौद्धिकांतील प्रत्येक शब्द तोंडपाठ किंवा हृदयपाठ असेल.

एकदा श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी मोतीबागेतील एका बौद्धिकात बोलताना म्हणाले होते की, ‘’कोणतेही काम व्यापक करत असताना, त्याला कार्यालय हे लागत असते. पण, कार्यालय हे प्रामुख्याने कामासाठी असते.” त्यांनी एका इंग्रजी म्हणीचाही संदर्भ दिला होता. ते म्हणाले होते की, ‘’टेक केअर ऑफ एव्हरी पेनी अ‍ॅण्ड पौंड विल टेक केअर ऑफ इट्स ओन” याचे आपल्या भाषेत सांगायचे झाले, तर ‘टेक केअर ऑफ पैसा आणि रुपी विल टेक केअर ऑफ इट्स ओन’ हे उदाहरण ऐकताना एक लक्षात ठेवा की, आपण काही रुपये किंवा पौंड जमविणारी माणसे नाही, तर बहुमोल स्वयंसेवकांसारखी रत्ने तयार करणारी माणसे आहोत. ‘परम् वैभवम् नेतुमेतत् स्वराष्ट्र’ हे त्यांचे शब्द उपस्थित सर्वांच्या मनात खोलवर रुजले. ते शब्द म्हणजे शतकाशतकांचे ध्येय स्वयंसेवकांच्या मनात ठसवायचा, तो एक मंत्र होता. वेदकाळात ऋषी-मुनींना वेदांचे मंत्र दर्शन देत असत, त्याच पद्धतीने श्रद्धेय दत्तोपंतांनी सर्वांच्या हृदयावर किंवा आत्म्यावरही ध्येयाचे दर्शन ठसविले.

मोतीबागेत गेली ६०-७० वर्षे वारंवार जाणारी मंडळीही आपल्या संघटनेच्या कामाखेरीज अन्य बाबींची चौकशीही करत नसत. पण, आज प्रत्येकाच्या समोर मोतीबागेची आज नव्याने उद्घाटित होत असलेली व आतापर्यंतची त्या-त्या काळातील इमारत उभी राहत आहे. प्रारंभी आत प्रवेश करताना डावीकडील लाकडी वाडा आणि समोर एक शेड होती. उजव्या बाजूला तीन खोल्या होत्या. पहिल्या खोलीत चौकशीचे कार्यालय असायचे. अनेकांची कामे तेथेच निम्मी पूर्ण होत असत. उत्तरेकडील दोन मजले आणि दामूअण्णा यांची खोली वगैरे तयार झाल्यावर नंतर घातलेल्या एका पूजेच्या कार्यक्रमात परम पूजनीय बाळासाहेब देवरस म्हणाले होते की, ”कार्यालय मोठे झाले, चांगले झाले. त्यासाठी काम करणार्‍या सर्वांचे परिश्रम आपण पाहिले. फार बरे वाटले. पण, सर्वांनीच एक गोष्ट लक्षात ठेवूया की, कार्यालय म्हणजे काम नव्हे. समाजातील आपल्या प्रत्येकाचे चारित्र्य, शिस्त, सतत अभ्यासवृत्ती, ध्येयाप्रति समर्पण या बाबी उभ्या करणे म्हणजे आपले काम होय.”

मी १९७० नोव्हेंबरमध्ये ’तरूण भारत’मध्ये बातमीदार म्हणून रुजू झाल्यापासून माझा कधी-कधी मोतीबागेशी संबंध येत असे. तो बहुदा येथे येणार्‍या महत्त्वाच्या व्यक्तींच्या बैठकीमुळेच येत येत. पहिली काही वर्षे मोतीबागेतील भेटीगाठींचे वृत्त देण्याचे काम कोणीतरी ज्येष्ठ व्यक्तीच करीत असे. मी फक्त बाजूला बसण्यापुरता जात असे. तेव्हा ’तरुण भारत’ची काही मोठी जबाबदारी असलेले विनायकराव जोशी मोतीबागेत राहत असत. अन्य कोणत्या तरी कामाला तेथे गेलेलो असताना, मला माननीय विनायकराव यांनी हाक मारली आणि म्हणाले की, ”बरंच काही चांगलं लिहिता म्हणे; पण लक्षात ठेवा. वेळीच आपले विधी आणि निषेध निश्चित करा. नाही तर या पत्रकारितेत हरवला, तर शोधूनही सापडणार नाही.“ खरे म्हणजे ते असे का म्हणाले, हे मला अजूनही कळलेले नाही. पण, दुसर्‍या दिवशी त्यावेळचा एक सहकारी प्रमोद महाजन (नंतरचे भाजपचे राष्ट्रीय नेते) मला म्हणाला की, ”काय मोरबा, कानाच्या झिणझिण्या कमी झाल्या की नाही.” मी उत्तर दिले.

”अरे, अजून सुरू व्हायच्यात. कारण मला अजून कळलेले नाही की, ते मला असे का म्हणाले. पण, एक गोष्ट खरी की, मी त्यामुळे अजून हबकलो आहे.” त्यावर तो म्हणाला की, ”हबकू वगैरे नको; पण अशाच शब्दांनी आमची आयुष्ये उभी राहिलीत. हे शब्द कळायला कदाचित चार-दोन दिवस लागतील किंवा ५० वर्षेही लागतील; पण एक लक्षात ठेव, विनायकराव रागावले आहेत ना! आयुष्यात कधीही काही कमी पडणार नाही आणि त्यांचे नाव आयुष्यभर काढशील.’‘ झालेही तसेच! त्यांचे माझ्यावर बारीक लक्ष असे. अन्य कोणी लेखाची कितीही स्तुती केली, तरी विनायकराव यांच्या चेहर्‍यावरील आठीही हलत नसे, तरीही माझ्या निवासाची आणि अन्य गरजांचीही ते चौकशीही करीत आणि काळजीही घेत.

असेच एकदा त्यावेळच्या ’तरुण भारत’च्या टिळकरोडवरील कार्यालयाशेजारी हॉटेल रामनाथमध्ये डबा खात असताना, प्रमोद महाजननी मला सांगितले होते की, ”मीही खेड्यातून आलो आहे. मी असाच दबकत-दबकत असतो. पण, एक गोष्ट लक्षात ठेव, आपले संपादक बापुराव भिशीकर, वृत्तसंपादक वसंतराव गीत आणि संघाचे प्रचारक विनायकराव जोशी हे आपले ‘ब्रह्मा-विष्णू-महेश’ आहेत. त्यांचे नाव घेतले तरी पत्रकारिता चांगली समजेल.” माझ्याबाबत तरी घडले तसेच. मी ही आठवण महाजन दिल्ली भेटल्यावर आवर्जून सांगितली.



- मोरेश्वर जोशी


 
अग्रलेख
जरुर वाचा
कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis शेतीसाठी 'एआय' वर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून, कृषी विभागाच्या सर्व योजना एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी ॲप व संकेतस्थळ विकसित करावे. कृषीमधील स्टॉर्टअपला प्रोत्साहन देवून नवकल्पना विकसित करण्यासाठी कृषी विभागाने प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या भेटीत राज्यातील कृषी क्षेत्रात सहकार्य करण्यास ते इच्छुक असल्याचे त्यांनी असल्याचेही असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले...

बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्या पुतण्यावर किरकोळ कारणावरून गोळीबार

बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्या पुतण्यावर किरकोळ कारणावरून गोळीबार

Bihar मधील भगलापूमधून मोठी बातमी समोर आली आहे. बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंतर राय यांच्या पुतण्यावर गोळीबार करत हत्या करण्यात आल्याची दुर्देवी घटना घडली आहे. पाण्यावरून झालेल्या वादातून दोन भावांनी गोळीबार केला असल्याचे सांगण्यात येत असून ज्यात भाऊ जगजीतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दुसरा भाऊ आणि त्याच्या आईलाही गोळ्या लागल्याने जखमी झाल्याचे वृत्त आहे. नवगछियामधील परबट्टा पोलीस ठाणअंतर्गत गजगतपूर गावात ही घटना घडली आहे. मृत आणि जखमी हे नित्यानंद हे चुलत भावाची मुलं आहेत...

महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या, जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी

"महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या", जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी

MLA MT Krishnappa कर्नाटक राज्यातील जनता दलाचे आमदार एमटी कृष्णाप्पा यांनी विधानसभेत बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्या विधानाने ते पुन्हा एकदा नकारात्मक दृष्टीकोन घेऊन प्रकाशझोतात आले आहेत. काही राज्यांमध्ये महिलांना संबंधित राज्य सरकार प्रतिमहा २ हजार तर महाराष्ट्र राज्यात लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून १५०० रुपये दिले जात आहेत. यावरून कर्नाटकातील पुरूषांना का काही नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जर महिलांना पैसे तर पुरूषांनाही मद्य दिले जावे, असे बेताल वक्तव्य एमटी कृष्णाप्पा यांनी केले ..

आता मुंबई, पुणे नाहीतर सांगलीतही बांगलादेशी घुसखोऱ्यांचा वावर, बनावट कागदपत्रांच्या आधारे केली घुसखोरी

आता मुंबई, पुणे नाहीतर सांगलीतही बांगलादेशी घुसखोऱ्यांचा वावर, बनावट कागदपत्रांच्या आधारे केली घुसखोरी

Bangladesh देशात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट सुरू आहे. मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांप्रमाणेच आता छोट्या शहरांमध्ये तर काही निमशहरांमध्ये बांगलादेशी घुसखोरी असल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीमध्ये बनावट कगदपत्र बनवत एका बांगलादेशी घुसखोऱ्याच्या पोलिसांनी त्याची चौकशी केली आहे. चौकशदरम्यान त्याने आपण बांगलादेशातील ढाकातील असल्याचे सांगितले आहे. आपले मूळ नाव अमीर हुसैन असूनही त्याने अमीर शेख या नावाचा वापर करत बनावट कागदपत्रांचा वापर केला...

मेरठनंतर आता जयपूरमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला जाळले

मेरठनंतर आता जयपूरमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला जाळले

Extramarital Affairsठेवणारी काळीज हेलावून टाकणाऱ्या धक्कादायक घटनेनंतर जयपूरमध्ये पती -पत्नीच्या नात्याला काळीमा लावणारी घटना समोर आली आहे. जयपूरमध्ये एका महिलेचे प्रेमसंबंध असलेल्या परपुरूषाला तिच्या पतीचा खून केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर तिने आपल्या पतीचा मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी सांगितले की, भाजी विक्रेता धन्नलाल सैनी याला त्याच्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती मिळाल्यानंतर तिने प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीला जाळलं आहे...