देशभरातील ६२ कोटी भक्तांना मिळणार ‘श्रीरामप्रसाद’

विहिंपतर्फे ‘अक्षतकलश’ मोहिम

    02-Nov-2023
Total Views | 75

vinod bansal

नवी दिल्ली : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी काही ना काही योगदान देणाऱ्या देशभरातील ६२ कोटी रामभक्तांना विश्व हिंदू परिषदेतर्फे (विहिंप) श्रीरामललाचा प्रसाद पोहोचविण्यात येणार आहे. अयोध्येत येत्या २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. अयोध्येत होणाऱ्या या अभुतपूर्व सोहळ्यासाठी संपूर्ण देश सज्ज होत आहे.

श्रीराम मंदिरासाठी आपापल्या क्षमतेप्रमाणे योगदान देणाऱ्या देशातील कोट्यवधी नागरिकांना श्रीरामाचा प्रसाद पोहोचविण्यात येणार आहे. त्यासाठी विहिंपच्या ४५ संघटनात्मक प्रांताचे अधिकारी ४ नोव्हेंबर रोजी अयोध्येत दाखल होणार आहेत, येथून ते ५ नोव्हेंबर रोजी श्रीरामललाचा प्रसादरूपी ‘अक्षतकलश’ आपापल्या प्रांतांमध्ये रवाना होणार आहेत. हा ‘अक्षतकलश’ प्रांत, विभाग, ब्लॉक असा प्रवास करून श्रीरामभक्तांच्या घरी पोहोचणार आहे.

‘अक्षतकलशा’च्या माध्यमातून २२ जानेवारी रोजी राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी जवळच्या मंदिरांमध्ये पोहोचून पूजा कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन विहिंपचे कार्यकर्ते करणार आहेत. आतापर्यंत एक लाखांहून अधिक मंदिरांमध्ये प्रार्थना करण्याची योजना आखण्यात आली आहे. श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी देशातील एकही मंदिर या मोहिमेत सहभागी होण्यापासून दूर राहू नये यासाठी विहिंप प्रयत्नशील आहे. त्यासाठी सर्व मंदिरांचे प्रशासक आणि पुजारी यांच्याशी संपर्क साधला जात आहे.

श्रीराम मंदिराच्या उभारणीदरम्यान लोकांकडून वर्गणी गोळा करण्यासाठी विहिंपतर्फे ४४ दिवसांचा कार्यक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमात देशातील १३ लाख गावांतील ६२ कोटी लोकांपर्यंत पोहोचण्यात विहिंपला यश आले होते. याशिवाय, राम मंदिराच्या आंदोलनापासून इतिहासाच्या विविध कालखंडात लाखो लोकांनी मंदिर उभारणीत आपली भूमिका बजावली होती. श्रीराम मंदिराच्या उद्घाटनात या सर्वांचा सहभाग सुनिश्चित करण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी दैनिक ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना दिली आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! 
 ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

weather update देशात अवकाळी पावसाने नागरिकांना चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे काही अंशी प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रात काही दिवसांआधी ढगाळ वातावरण होते. तर काही बागात रिमझिम पावसाच्या सरी आल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर अशातच आता राज्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसाने धिंगाणा घातला आहे. यामुळे जिवीत हाणी झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये १० एप्रिल २०२५ रोजी वादळी वाऱ्यामुळे एक दोन नाहीतर ..

तहव्वूर राणाच्या एनआयए चौकशीला सुरुवात! एनआयए मुख्यालयाबाहेर सुरक्षेत वाढ; फक्त १२ अधिकाऱ्यांनाच चौकशी कक्षात प्रवेश

तहव्वूर राणाच्या एनआयए चौकशीला सुरुवात! एनआयए मुख्यालयाबाहेर सुरक्षेत वाढ; फक्त १२ अधिकाऱ्यांनाच चौकशी कक्षात प्रवेश

(Tahawwur Rana's NIA Interrogation Begins) २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार दहशतवादी तहव्वूर राणाचे अखेर गुरुवारी १० एप्रिल रोजी तब्बल १७ वर्षांनी भारतात यशस्वी प्रत्यार्पण झाले आहे. गुरुवारी १० एप्रिलला रात्री राणाला दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एनआयएच्या विशेष न्यायालयाकडे एनआयएने २० दिवसांची कोठडी मागितली होती. परंतु, न्यायालयाने एनआयएला राणाची १८ दिवसांची कोठडी दिली. ताब्यात घेतल्यानंतर, तहव्वूर राणाची आता एनआयए मुख्यालयात चौकशीला सुरुवात झाली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121