'विकसित भारत संकल्प यात्रे'ला वनवासी भागात उत्स्फूर्त प्रतिसाद!

    17-Nov-2023
Total Views | 59
vikas sankalp yatra news

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरु झालेल्या ' विकसित भारत संकल्प यात्रे'ला देशभरातील आदिवासीबहुल भागात प्रतिसाद मिळत आहे. हे संकल्प रथ ठिकठिकाणी जाऊन विविध शासकीय योजनांबद्दल व्यापक जनजागृती करत आहेत. महाराष्ट्रात नंदुरबार पालघर, नाशिक,गडचिरोली आणि नांदेड या आदिवासीबहुल जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा प्रामुख्याने आयोजित करण्यात आली असून हे प्रचार रथ वेगवेगळ्या गावांमध्येपोचत असून गावकर्यांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.


vikas sankalp yatra news


सरकारच्या या विशाल संपर्क कार्यक्रमाचा भाग असलेले हे संकल्प रथ म्हणजे विशेष प्रकारे रचना केलेल्या ५ आयईसी(माहिती,शिक्षण आणि संपर्क ) व्हॅन आहेत. राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा स्तरावर प्रमुख योजना, ठळक मुद्दे आणि कामगिरी दर्शवणाऱ्या हिंदी आणि प्रादेशिक भाषांमधील चित्रफिती , माहितीपत्रके, पुस्तिका, पत्रके आणि फ्लॅगशिप स्टँडीच्या माध्यमातून माहितीचा प्रसार करण्यासाठी या आयईसी व्हॅन्स अर्थात प्रसार रथ सुसज्ज आहेत.
 
दि. १६ नोव्हेंबर रोजी या संकल्प रथांनी पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आपला संचार सुरु केला आहे. पालघर तालुक्यासह, वाडा, डहाणू आणि विक्रमगड या तालुक्यांमध्ये एकूण ४ संकल्प रथ विविध गावात भेटीसाठी दाखल झाले आहेत.पालघरमधील शिरगांव, बोर्डी, बिलावली आणि कोंडगांव याठिकाणी विकसित भारत संकल्प रथाचे जोरदार स्वागत करण्यात आले. रथातून देण्यात येत असलेल्या माहितीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.


अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121