राजनाथ सिंह मिझोराममध्ये मणिपूरचा संदर्भ देत म्हणाले-'हिंसा हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही...'

    01-Nov-2023
Total Views | 33
rajnath singh on manipur violence

इम्फाळ
: मणिपूरमधील हिंसक घटनांवरून विरोधकांच्या हल्ल्यांदरम्यान, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, मणिपूरमधील हिंसाचारामुळे आम्हाला त्रास सहन करावा लागला असला तरी, गेल्या ९ वर्षांत ईशान्य भागात शांतता आहे.

मिझोरम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका जाहीर सभेला संबोधित करताना ते म्हणाले, "मला प्रामाणिकपणे सांगायचे आहे की मणिपूरमधील हिंसाचार कोणत्याही राजकीय पक्षाने भडकावला नव्हता, उलट तेथे परिस्थिती आणखी बिघडली होती." मिझोराममध्ये ७ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मणिपूरमधील हिंसाचार हा मोठा मुद्दा आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, "आम्हाला विश्वास आहे की जोपर्यंत ईशान्येचा खऱ्या अर्थाने विकास होत नाही, तोपर्यंत सशक्त, समृद्ध, आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण होणार नाही." यादरम्यान त्यांनी मणिपूर हिंसाचाराचाही उल्लेख केला.राजनाथ सिंह यांनी मणिपूरमधील मेतेई आणि कुकी समुदायांना एकत्र बसण्याचे, मनापासून बोलणे आणि विश्वासाची कमतरता दूर करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “हिंसा हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही. आपल्याला मनापासून संवाद साधण्याची गरज आहे. ”

दरम्यान मणिपूर हिंसाचारावर काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप राजनाथ सिंह यांनी केला आणि मिझोराम आणि ईशान्येसह संपूर्ण देशाला काँग्रेसच्या नकारात्मक राजकारणापासून दूर ठेवण्याची गरज असल्याचे सांगितले. सिंग म्हणाले की, मणिपूरमधील परिस्थिती बिघडली असताना काँग्रेसने या प्रकरणात राजकारण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. त्यांनी नकार देऊनही त्यांचे नेते (राहुल गांधी) मणिपूरला भेट देऊन लोकांच्या जखमा चिघळवल्या.
 
विधानसभेच्या ४० जागांसाठी ७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. येथे सत्ताधारी नॅशनल फ्रंट (एमएनएफ), झोराम पीपल्स मूव्हमेंट (झेडपीएम), काँग्रेस आणि भाजप रिंगणात आहेत. 2018 च्या निवडणुकीत MNF ने 26 जागा जिंकल्या होत्या, तर कॉंग्रेसने 5 जागा जिंकल्या होत्या आणि भाजपने 1 जागा जिंकली होती, तर अपक्ष उमेदवारांनी 8 जागा जिंकल्या होत्या.




अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121