कृत्रिम बुद्धिमत्ता 'तारक की मारक' विषयावर परिसंवाद

कृत्रिमबुध्दीमत्तेचा सकारात्मक वापर फायदेशीर ठरणार असल्याचे मत

    09-Oct-2023
Total Views | 219

seminar


वसई :
वसईतील साहित्य जल्लोष प्रतिष्ठान आयोजित "एकविसावा साहित्य जल्लोष" या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात परिसंवाद आयोजित करण्यात आला. परिसंवादाचा विषय कृत्रिम बुद्धिमत्ता तारक की मारक असा होता. पुढील काळात कृत्रिम बुध्दीमत्ताच जगावर अधिराज्य गाजविणार आहे. प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुध्दीमत्ता काम करणार आहे. कृत्रिमबुध्दीमत्तेचा सकारात्मक वापर फायदेशीर ठरणार असल्याचे मत परिसंवादातून व्यक्त करण्यात आले.

या परिसंवादात प्रमुख पाहुणे म्हणून वसई - विरार चे प्रथम महापौर राजीव पाटील उपस्थित होते. या परिसंवादात आयटी तज्ञ डॉ भूषण केळकर, ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव, संगणक तज्ञ आणि लेखक विवेक मेहत्रे, रुचिरा सावंत यांचा सहभाग होता.

कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर हे पाहिलं चर्चासत्र आहे असे डॉ भूषण केळकर म्हणाले, संविधान जेवढं चांगलं वापरलं जाईल तेवढं ते चांगलं राहिल असं डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. त्याच प्रमाणे कृत्रिम बुध्दीमत्तेचा चांगला वापर केला तर ते फायदेशीर ठरेल. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे येत्या १०-१५ वर्षात बदल घडणार असुन तरुणपिढी यासाठी तयार नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता तारक की मारक तर हे तारक ही आहे आणि मारक सुद्धा आहे. जसे की याचा वापर जितका चांगला तितका वाईट आहे, पण वापरणाऱ्या माणसांवर अवलंबून आहे. पुल देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली मधील पात्र देखील एआयच्या माध्यमातून तयार केले जाऊ शकते असे त्यांनी सांगितले.

पुढे विवेक मेहेत्रे म्हणाले AI च महत्व कळणं काळाची गरज आहे. जॉन मॅककार्थी यांनी १९५६ साली आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा शोध लावला होता. तसेच कालांतराने ह्या तंत्रज्ञानाला खूप मागणी वाढू लागली. भविष्यात ह्याच तंत्रज्ञानाचा बोलबाला असणार आहे. भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान मानवी जीवनाचा एक हिस्सा बनणार आहे. विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे आत्मसात केले पाहिजे. चॅट जीपीटी फुकट आणि महासागर आहे. चॅट जीपीटी च्या चांगल्या , वाईट अश्या दोन्ही बाजू आहेत. या वापरामुळे नवीन कल्पकता जन्माला येते. ९० टक्के लोक AI ला शिव्या देतात कारण जॉबच्या प्रश्नामुळे जसे कॉम्प्युटरला देत होते. योग्य रीतीने भान ठेवून वापर केला पाहिजे. हे आधुनिक तंत्रज्ञान सुशिक्षितांना देखील त्याची फार माहिती नसल्याची खंत व्यक्त केली . एआय १० सेकंदात चित्रकार राजा रवी वर्मापेक्षा १०० पटीने चांगले चित्र काढून देऊ शकतो असेही त्यांनी सांगितले.

रुचिरा सावंत यांनी एआय वापरण्यासाठी इंटेलिजन्स होण्याची गरज व्यक्त केली. आपण स्वतः शिकलो पाहिजे मुलांना मार्गदर्शन करायला पाहिजे. असे रुचिरा सावंत यांनी सांगितले. असे तर विज्ञानाला मर्यादा असते तर अधिक ज्ञान म्हणजे विज्ञान. विज्ञानाचे भय बाळगू नका. असे मत ज्ञानेश महादेव यांनी व्यक्त केले.


अग्रलेख
जरुर वाचा
काँग्रेस संबंधित कंपन्यांवर ईडीची टांगती तलवार, कार्यवाहीस लवकरच सुरूवात होणार

काँग्रेस संबंधित कंपन्यांवर ईडीची टांगती तलवार, कार्यवाहीस लवकरच सुरूवात होणार

ED काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्याशी संबंधित असणार्‍या कंपनीवर सक्तवसुली संचालनालयाने शनिवारी कार्यवाहीस सुरूवात केली. या मालमत्तेत दिल्ली, मुंबई आणि लखनऊमधील प्रमुख असणाऱ्या मालमत्तांचा समावेश आहे. काँग्रेसच्या संबंधित असणाऱ्या कंपनीशी नॅशनल हेराल्ड प्रकरणात असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड कंपनीकडे ६०० कोटी रुपयांहून अधिक किंमतीची मालमत्ता असल्याचे बोलले जात आहे. त्यापैकी देशाची राजधानी दिल्लीतून बहादूर शाह जाफर मार्गावरील प्रतिष्ठित हेराल्ड हाऊस आहे...

अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Bangladeshi राजस्थानातील अजमेर पोलिसांनी २३ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी घुसखोरी व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या आहेत. व्हिसाशिवाय अवैधपणे बांगलादेशी व्यक्तीने भारतात घुसखोरी केली आणि त्याला तब्बल २३ वर्षानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित अवैधपणे घुसखोरी करणाऱ्याचे नाव हे मोहम्मद शाहिद असून त्याचे वय वर्षे हे ४० आहे. तो अजमेरमधील अंदर कोट परिसरात अवैधपणे वास्तव्य करत होता. एटीएएफने एकूण अकरा कारवायांमध्ये एकूण २१ घुसखोरांना पकडले आहे. दरम्यान, आता दर्गा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121