सुळेंचीही ‘वायनाड’ शोधमोहीम

    04-Oct-2023   
Total Views | 285
Supriya Sule And Sharad Pawar NCP Election Strategy

महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत घडलेल्या घडामोडी आणि राजकीय स्थित्यंतरांमुळे कधी काय घडेल, याचा अंदाज बांधणे केवळ अशक्यच. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे भरभक्कम बहुमताचे सरकार सत्तेत आल्याने उरलासुरला विरोधी पक्ष आता गलितगात्र ठरल्याने मोठमोठ्या राजकीय प्रस्थापितांसमोरही येत्या निवडणुकीत आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचे आव्हान आहेच. २०१९ मध्येही मोदींच्या करिष्म्यामुळे अशीच स्थिती तेव्हा अनेक विरोधी नेत्यांवर आली होती. आता महाराष्ट्रातील काही महत्त्वपूर्ण मतदारसंघात वर्षानुवर्षे चिकटलेल्या नेत्यांसाठी पक्षफुटी ही डोकेदुखी ठरली आहे. २०१९च्या मोदीलाटेत आपला पराभव होणार, याची एक हजार टक्के खात्री राहुल गांधींना होती. त्यामुळे त्यांनी संभाव्य मानहानिकारक पराभव आणि हक्काच्या मतदारसंघातून बेदखल होण्याच्या भीतीतून अमेठी सोबतच केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवली. अपेक्षेप्रमाणे पारंपरिक मतदारसंघ असलेल्या अमेठीत गांधींचा लाजिरवाणा पराभव झाला आणि वायनाडच्या जागेवरून विजयी होत, त्यांनी लोकसभा गाठली. हाच कित्ता शरद पवार गटाच्या खासदार आणि पवारांच्या कन्या सुप्रिया सुळेदेखील गिरवत असल्याचे दिसून येते. अजितदादांचे बंड, भाजपचे बारामती लोकसभेवर असलेले विशेष लक्ष आणि सुनेत्रा पवारांच्या निवडणूक लढविण्याच्या चर्चेमुळे सुप्रियाताईंसाठी आता बारामतीचा किल्ला सर करणे अवघड दिसू लागले. परवा एका कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे यांनी आपल्याला वर्धा लोकसभेतून निवडणूक लढवायला आवडेल, असे विधान करून आपणही ’वायनाड शोधला’ हे जणूकाही जाहीरच करून टाकले आहे. गेल्या अनेक वर्षांत केवळ पवारांची कन्या आणि राजकीय उत्तराधिकारी म्हणूनच सुप्रियाताई बारामतीतून विजयी होत आल्या. त्यात अजितदादांचे योगदान सर्वाधिक होते, हे सर्वमान्य. मात्र, आता दादांनी थेट मोठ्या पवारांविरोधात शड्डू ठोकल्याने या लढाईत सुप्रियाताईंचाही निभाव लागेल का, असा सवाल खुद्द मोठ्या पवारांनाही पडला असावा. त्यामुळे पवार साहेब आणि सुप्रियाताई जाग्या झाल्या असून, बारामतीतील संभाव्य पराभवानंतरचा पर्याय म्हणून कदाचित त्यांनी वर्ध्याला निवडले असेल, तर हा पवारांचा नैतिक पराभव आहे, हे मात्र नक्की!

आस्मान से गिरे और...

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या दरबारातील सल्लागारांची देशात कायम चर्चा ऐकायला मिळायची. आर. के. धवन असोत किंवा वादग्रस्त तथाकथित आध्यात्मिक गुरु चंद्रास्वामी, या सगळ्याच मंडळींनी दिलेले सल्ले अन् त्यातून उद्भवलेले वाद यामुळे इंदिरा अनेकदा अडचणीत आल्याचे पाहायला मिळाले. अशाच प्रकारे आता गांधींची तिसरी पिढी असलेल्या राहुल आणि प्रियांका यांच्या सल्लागारांनी दिलेल्या सल्ल्याची प्रकर्षाने चर्चा होत आहे. प्रियांका यांचे सल्लागार प्रमोद कृष्णन यांनी प्रियांका गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवतील, असे संकेत दिले आहेत. त्याला जोडूनच काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी या चर्चेवर प्रतिक्रिया द्वेत प्रियांका यांचे स्वागत केले आहे. राजकीयदृष्ट्या केंद्रस्थानी असलेल्या महाराष्ट्राकडे मोदी आणि शाह यांनी लक्ष केंद्रित केल्यानंतर आता काँग्रेसही आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवणार, याचे संकेत मिळू लागले आहेत. प्रियांका यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवून पक्षाची स्थिती सुधारण्याचे हे प्रयत्न महाराष्ट्र काँग्रेससाठी कितपत फायदेशीर ठरतील, हा मोठा प्रश्न आहेच. २०१७ साली राजकीय अनुषंगाने उत्तर प्रदेशसारख्या राज्यातून आपला पाया मुळासकट उखडून फेकला जाऊ नये, यासाठी प्रियांका यांच्यवर महासचिवपदाची जबाबदारी देऊन ’प्रतिइंदिरा’ म्हणून त्यांना प्रोजेक्ट केले खरे. परंतु, केवळ इंदिरा यांच्यासारखे नाक हा एकमेव ‘युएसपी’चा मुद्दा असलेल्या प्रियांका यांना उत्तर प्रदेशाने सपशेल नाकारले आणि सगळ्या जागांवर पराभवाची चव चाखायला लावली. हाच कित्ता काँग्रेस आणि प्रियांका जर महाराष्ट्रात गिरवू पाहत असतील, तर काँग्रेसची स्थिती ’आस्मान से गिरे और खजूर में अटके,’ अशी व्हायला वेळ लागणार नाही. महाराष्ट्रात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीने सरकारच्या माध्यमातून आपल्या पक्ष संघटना बळकट केल्या आहेत. शरद पवार गट आणि उबाठा गट यांचे एकूणच अस्तित्व किती आणि सध्याच्या भावनिक वातावरणाला निवडणुकीपर्यंत कायम ठेवून त्याचे मतात रुपांतरण करण्यात दोन्ही गट यशस्वी होतील का, याबाबत मोठी साशंकता आहे. या परिस्थितीत काँग्रेसची संघटनात्मक शक्ती या दोन्ही गटांपेक्षा कणभर अधिक असली, तरी सक्षम नेतृत्व नसल्याने महाराष्ट्र काँग्रेस गलितगात्र अवस्थतेत आहे. या गदारोळात जर प्रियांका लोकसभेसाठी महाराष्ट्रात आल्या आणि जर उत्तर प्रदेशच्या पराभवाची पुनरावृत्ती झाली, तर प्रियांका यांच्यासाठी तो दुसरा मोठा धक्का मानावा लागेल.


ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.
अग्रलेख
जरुर वाचा
कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis शेतीसाठी 'एआय' वर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून, कृषी विभागाच्या सर्व योजना एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी ॲप व संकेतस्थळ विकसित करावे. कृषीमधील स्टॉर्टअपला प्रोत्साहन देवून नवकल्पना विकसित करण्यासाठी कृषी विभागाने प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या भेटीत राज्यातील कृषी क्षेत्रात सहकार्य करण्यास ते इच्छुक असल्याचे त्यांनी असल्याचेही असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले...

बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्या पुतण्यावर किरकोळ कारणावरून गोळीबार

बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्या पुतण्यावर किरकोळ कारणावरून गोळीबार

Bihar मधील भगलापूमधून मोठी बातमी समोर आली आहे. बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंतर राय यांच्या पुतण्यावर गोळीबार करत हत्या करण्यात आल्याची दुर्देवी घटना घडली आहे. पाण्यावरून झालेल्या वादातून दोन भावांनी गोळीबार केला असल्याचे सांगण्यात येत असून ज्यात भाऊ जगजीतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दुसरा भाऊ आणि त्याच्या आईलाही गोळ्या लागल्याने जखमी झाल्याचे वृत्त आहे. नवगछियामधील परबट्टा पोलीस ठाणअंतर्गत गजगतपूर गावात ही घटना घडली आहे. मृत आणि जखमी हे नित्यानंद हे चुलत भावाची मुलं आहेत...

महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या, जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी

"महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या", जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी

MLA MT Krishnappa कर्नाटक राज्यातील जनता दलाचे आमदार एमटी कृष्णाप्पा यांनी विधानसभेत बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्या विधानाने ते पुन्हा एकदा नकारात्मक दृष्टीकोन घेऊन प्रकाशझोतात आले आहेत. काही राज्यांमध्ये महिलांना संबंधित राज्य सरकार प्रतिमहा २ हजार तर महाराष्ट्र राज्यात लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून १५०० रुपये दिले जात आहेत. यावरून कर्नाटकातील पुरूषांना का काही नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जर महिलांना पैसे तर पुरूषांनाही मद्य दिले जावे, असे बेताल वक्तव्य एमटी कृष्णाप्पा यांनी केले ..

आता मुंबई, पुणे नाहीतर सांगलीतही बांगलादेशी घुसखोऱ्यांचा वावर, बनावट कागदपत्रांच्या आधारे केली घुसखोरी

आता मुंबई, पुणे नाहीतर सांगलीतही बांगलादेशी घुसखोऱ्यांचा वावर, बनावट कागदपत्रांच्या आधारे केली घुसखोरी

Bangladesh देशात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट सुरू आहे. मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांप्रमाणेच आता छोट्या शहरांमध्ये तर काही निमशहरांमध्ये बांगलादेशी घुसखोरी असल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीमध्ये बनावट कगदपत्र बनवत एका बांगलादेशी घुसखोऱ्याच्या पोलिसांनी त्याची चौकशी केली आहे. चौकशदरम्यान त्याने आपण बांगलादेशातील ढाकातील असल्याचे सांगितले आहे. आपले मूळ नाव अमीर हुसैन असूनही त्याने अमीर शेख या नावाचा वापर करत बनावट कागदपत्रांचा वापर केला...

मेरठनंतर आता जयपूरमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला जाळले

मेरठनंतर आता जयपूरमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला जाळले

Extramarital Affairsठेवणारी काळीज हेलावून टाकणाऱ्या धक्कादायक घटनेनंतर जयपूरमध्ये पती -पत्नीच्या नात्याला काळीमा लावणारी घटना समोर आली आहे. जयपूरमध्ये एका महिलेचे प्रेमसंबंध असलेल्या परपुरूषाला तिच्या पतीचा खून केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर तिने आपल्या पतीचा मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी सांगितले की, भाजी विक्रेता धन्नलाल सैनी याला त्याच्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती मिळाल्यानंतर तिने प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीला जाळलं आहे...