केरळ हल्ल्याची जबाबदारी घेणारा डॉमिनिक मार्टिन कोण, त्याचा दुबईशी काय संबंध?

    30-Oct-2023
Total Views | 446
Dominic Martin

तिरुवनंतपुरम : केरळमधील कोची येथील एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये दि. २९ ऑक्टोबर रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात दोन जण ठार तर ५० हून अधिक लोक जखमी झाले. घटनेच्या काही तासांनंतर, डॉमिनिक मार्टिन नावाच्या व्यक्तीने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आणि थ्रिसूर ग्रामीणमधील कोकादरा पोलिस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केले.

डॉमिनिक मार्टिन यांनी दावा केला आहे की, तो यहोवाच्या साक्षीदार समुदायाचा सदस्य आहे. या कृत्याला आपणच जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याने यहोवाच्या साक्षीदारांना दिशाभूल करणारे आणि देशद्रोही असे वर्णन केले. मार्टिनने हल्ल्याची जबाबदारी स्विकारल्यावर तपास यंत्रणांनी त्याच्या पार्श्वभूमीचा शोध घ्याला सुरुवात केली. दरम्यान, त्याचे दुबई कनेक्शन असल्याची माहिती मिळाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान एजन्सीला कळले की डॉमिनिक मार्टिन दुबईमध्ये सुमारे १५ वर्षे राहत होता आणि २ महिन्यांपूर्वी भारतात परतला होता. याशिवाय, त्याच्याबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी, एजन्सी त्याच्या कॉल डिटेल्स रेकॉर्डद्वारे त्याच्या संपर्कात असलेल्या लोकांची चौकशी करत आहेत.

सूत्रांनी सांगितले की, मार्टिन हा दुबईत इलेक्ट्रिक मॅन म्हणून काम करायचा. त्यांना इलेक्ट्रिक सर्किट बनवण्याचे पूर्ण ज्ञान होते. दुबईत तो कोणाच्या संपर्कात होता याचा तपास करण्यात तपास यंत्रणा व्यस्त आहेत.

पीएफआयच्या सहभागाची चौकशी

या बॉम्बस्फोटांमागे पीएफआयचा हात होता का याचाही तपास एजन्सी करत आहेत, जी बंदी नंतर पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होती. विशेष म्हणजे कन्व्हेन्शन सेंटरमध्ये इस्रायलच्या समर्थनार्थ ठराव मंजूर करण्यात आला.अशा परिस्थितीत पॅलेस्टाईन समर्थकांनी बदल्यापोटी हा हल्ला केला असण्याची शक्यता आहे आणि डॉमिनिक मार्टिन हा केवळ एक चेहरा असू शकतो आणि या हल्ल्याचा कट काही मोठ्या दहशतवादी संघटनेने रचला असावा.
अग्रलेख
जरुर वाचा
Mock Drill India : देशभरात युद्धाचे

Mock Drill India : देशभरात युद्धाचे 'मॉक ड्रील'! ७ 'मे'ला नक्की काय घडणार?

Mock Drill India : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारत-पाकिस्तान युद्धाच्या चर्चा असताना दोन्ही देशांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होत असल्याचंही पहायला मिळतंय. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर युद्धसज्जतेच्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातल्या २४४ जिल्ह्यांमध्ये बुधवार दि. ७ मे रोजी 'मॉक ड्रील' अर्थात युद्धकाळातील उपायांचा सराव करण्याचे निर्देश दिले आहेत. . या २४४ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121