पालघर साधू हत्याकांड हा फक्त अपघात, ठाकरेंच्या बदनामीसाठी षडयंत्र : राऊत

    25-Oct-2023
Total Views | 56
 
Raut
 
 
मुंबई : दसरा मेळाव्यानंतर पहिल्यांदाच घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊतांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पालघर साधू हत्याकांड हा फक्त एक अपघात होता. हा अपघात उद्धव ठाकरेंच्या बदनामीसाठी षडयंत्र रचण्यात आलं, असा अजब तर्क खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
 
राऊत म्हणाले, "पालघर साधू हत्याकांड हा फक्त अपघात होता. उद्धव ठाकरेंना बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचा कट रचला होता. मराठा आरक्षण द्यावंच लागेल. उपकार करताय का? नाहीतर महाराष्ट्रात आग लागेल. तुम्हाला कुणीही विचारणार नाही. तुम्ही कुणाच्या मेहेरबानीनं मुख्यमंत्री झालात, का झालात हे सगळ्यांना माहिती आहे. जोपर्यंत तुम्हाला तिथे बसवलंय, तोपर्यंत तुम्हाला हे काम करावंच लागेल. तुमच्यात हिंमत असेल तर निवडणुका घेऊन दाखवा. तुम्ही मुख्यमंत्री राहणार नाहीत तेव्हा अशी सभा घेऊन दाखवा. आम्हाला न्यायालयाचाही निर्णय नकोय. गरज नाही आम्हाला त्याची. जनतेच्या न्यायालयात चला. निवडणूक घ्या. तिथे ठरेल कोणती शिवसेना खरी आणि कोणती खोटी ते.” असं राऊतांनी म्हटलं आहे.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
Mock Drill India : देशभरात युद्धाचे

Mock Drill India : देशभरात युद्धाचे 'मॉक ड्रील'! ७ 'मे'ला नक्की काय घडणार?

Mock Drill India : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारत-पाकिस्तान युद्धाच्या चर्चा असताना दोन्ही देशांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होत असल्याचंही पहायला मिळतंय. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर युद्धसज्जतेच्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातल्या २४४ जिल्ह्यांमध्ये बुधवार दि. ७ मे रोजी 'मॉक ड्रील' अर्थात युद्धकाळातील उपायांचा सराव करण्याचे निर्देश दिले आहेत. . या २४४ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121