मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी खूशखबर! 'या' स्थानकांदरम्यान उभारणार नवीन स्थानक!

    13-Oct-2023
Total Views | 687

railway station

मुंबई :
मध्य रेल्वे मुंबईच्या बदलापूर, अंबरनाथ रेल्वे स्थानकादरम्यान एक नवीन रेल्वे स्थानक उभारण्यात येणार आहे. याकरता गेल्या ८ वर्षांपासून प्रवासी मागणी करत होते. ११ ऑक्टोबरला प्रवाशांच्या मागणीला यश आले असून मध्य रेल्वेकडून स्थानक उभारणीला सुरुवात झाली आहे.

बदलापूर ते अंबरनाथ रेल्वे स्थानका दरम्यान सात किलोमीटरचे अंतर आहे. त्यामुळे मध्यावर राहणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रवासासाठी मोठ्या प्रमाणात पायपीट करावी लागते. यासाठी प्रवाशांनी मध्यभागी चिखलोली स्थानक उभारावे याची मागणी केली होती. हे रेल्वे स्थानक अंबरनाथ स्थानकापासून ४.३४ किलोमीटर आहे. तर, बदलापूर स्थानकापासून ३.१ किलोमीटर अंतरावर आहे. या प्रकल्पाकरता मुंबई रेल्वे विकास महामंडळाने ८१.९३ कोटींचा निविदा मंजुर केला आहे.

तसेच, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने कल्याण ते बदलापूर स्थानकादरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या मार्गावर लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय गाड्या वेगवेगळ्या मार्गाने धावतील. या कामासाठीदेखील कोटींचा निविदा देण्यात येणार आहे. निविदा मंजुर झाल्यामुळे कामाला वेग येऊन पुढील २ वर्षात ही कामे पुर्ण होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

Tahawwur Rana काँग्रेस नेतृत्वाखालील असणाऱ्या युपीए सरकारला सत्तेतून बाहेर जाऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विरोधक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए सरकारच्या प्रत्येक कामाचे श्रेय हे स्वत:घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून युपीए सरकारच्या शासनकाळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संबंधित दहशतवाद्याचे प्रत्यार्पित करण्यात आले. मात्र, याचे सर्व श्रेय हे काँग्रेस घेत असल्याच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121