मुंबई : 'महाराष्ट्र लोकसेवा आयोग' अर्थात एमपीएससी अंतर्गत राज्यसेवा २०२२चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेचा यंदाचा कट ऑफ जाहीर करण्यात आला असून यानुसार विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर या उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड होणार आहे. त्यानंतर अंतिम निकाल जाहीर होईल.
दरम्यान, दरवर्षी राज्यसेवा परीक्षेचा ‘कट ऑफ’ वाढत असून एमपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढत आहे. त्याचा परिणाम म्हणून ही स्पर्धा वाढली असून ‘कट ऑफ’ही वाढत आहे. २०१७ मध्ये ‘कट ऑफ’ ४३४ होता. तर २०१८ मध्ये हा ‘कट ऑफ’ ४६७ होता. तसेच, २०१९ ला ४५९, २०२० ला ४६७, २०२१ ला ४७७ तर २०२२ला ४८८ एवढा ‘कट ऑफ’ आहे. या आकडेवारीवरुन दरवर्षी राज्यसेवा मुख्य परीक्षेचा कट ऑफ वाढत असल्याचे दिसून येते.