शेती विकासात कृषि विज्ञान केंद्रांची भुमिका महत्त्वाची!

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांचे प्रतिपादन

    19-Jan-2023
Total Views | 69
नरेंद्रसिंग तोमर

पुणे
: भारतीय शेतीच्या विकासात कृषि विज्ञान केंद्रांची भुमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी केले आहे. भारतीय कृषि अनुसंधान परिषदे अंतर्गत अटारी पुणे कार्यालयाचे उद्‌घाटन नरेंद्रसिंग तोमर यांच्या हस्ते संपन्न झाले, त्याप्रसंगी ते ऑनलाइन पद्धतीने बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी, भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महानिदेशक (कृषि विस्तार) डॉ. व्ही. पी. चहल, महात्मा फुले कृषि विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, अटारी पुणेचे संचालक डॉ. लाखन सिंग यांची उपस्थिती होती. तर भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे उपमहानिदेशक (कृषि विस्तार), काणेरी मठ कोल्हापूरचे अध्यक्ष परम पूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांची ऑनलाइन उपस्थिती होती.

कृषी औद्योगिक संशोधन संस्था अटारी पुणे च्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या दूरस्थ उपस्थितीत आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
 
पुढे बोलतांना केंद्रीय कृषिमंत्री म्हणाले की, देशात सध्या 783 कृषि विज्ञान केंद्र कार्यरत झाले असून सध्याच्या बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ आपली महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. भारतीय कृषि अनुसंधान परिषदेने या संदर्भात अनेक हवामान अनुकूल तसेच जैवसंपृक्त वाण विकसित केले आहेत. कोविड काळात सुद्धा कृषि क्षेत्राचे काम उल्लेखनीय राहिले असून भारत आता मागणारा नाही तर देणारा देश झाला आहे. भविष्यात कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांना अधिक जबाबदारीने काम करावे लागेल असे ते म्हणाले.

कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी म्हणाले की, देशाला सध्या नैसर्गिक शेती आणि पौष्टिक तृणधान्ये वाढीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. माननीय पंतप्रधान कृषि क्षेत्राच्या पायाभूत विकासाच्या बाबतीत सकारात्मक असून कृषि विज्ञान केंद्राचे कृषि क्षेत्रातील योगदान पाहता भविष्यात कृषि विज्ञान केंद्रांना अधिक बळकट करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.






अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121