मुंबईकरांपेक्षा पेंग्विनच प्रिय!

    24-Sep-2022   
Total Views |
पेंग्विन
 
 
 
राज्यासह देशभरात मागील अडीच वर्षे कोरोनाचा प्रकोप होता. हजारो माणसे, आपली आप्तस्वकीय मंडळी आणि अनेक जीव या कोरोनाकाळात मृत्युमुखी पडले ते याच कोरोनाकाळात. या दरम्यान राज्य सरकारसह मुंबई महापालिका प्रशासनाची आरोग्य यंत्रणा संकटांना सामोरे जाण्यासाठी कितपत सक्षम आहे, याचा प्रत्यक्ष पुरावाच कोरोनाने दिला.
 
 
 
रुग्णालयातील नागवी व्यवस्था, असंवेदनशील प्रशासन आणि इतर बाबींमुळे मुंबई महापालिकेच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली होती. कोरोनात चार हजार कोटींचा खर्च उपाययोजनांसाठी केल्याचे प्रशासन सांगते, पण मृत्यूची खरी आकडेवारी द्यायलाही ते घाबरले. तात्पर्य हेच की, एकीकडे कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात मुंबईकर मरत असताना दुसरीकडे राणीच्या बागेवर देखभाल आणि इतर कामांसाठी मात्र २५ कोटींपेक्षा अधिकचा पैसा खर्च झाला आहे.
 
 
माहिती अधिकार याचिकेला उत्तर देताना ही माहिती स्वतः राणीच्या बागेच्या प्रशासनाने दिली आहे. भायखळा येथील वीर जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील पेंग्विनच्या देखभालीसाठी गेल्या चार वर्षांमध्ये तब्बल १९.११ कोटींचा; तर प्राणिसंग्रहालयातील उद्यानासाठी ९.५२ कोटींचा खर्च केल्याची बाब माहिती अधिकारातून उघड झाली.
 
 
मुंबईच्या पर्यटनात वृद्धी होण्यासाठी आवश्यक ते सर्व करणे क्रमप्राप्त असले तरी वेळेचे भान लक्षात घेता निर्णय घेणे हे सरकारच्या विवेकाचे प्रदर्शन करणारे ठरत असते. मुंबई महापालिका जगातील सर्वात धनाढ्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोजली जाते. त्यावर अधिक बोलणे आवश्यक नाही. पण, केवळ एका बागेवर २५ कोटींहून अधिक खर्च करणे तत्कालीन सत्ताधारी मंडळींच्या बौद्धिक दिवाळखोरीचे प्रतीक आहे, असं म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही.
 
 
राणीबागेत आणलेल्या प्राण्यांच्या अधिवासासाठी बनवण्यात येणार्या पिंजर्याच्या खरेदीतही भ्रष्टाचार झाल्याची बाबही सप्रमाण सिद्ध झाली होती. त्यामुळे एकीकडे मुंबईकर मरत असताना पेंग्विन मात्र सत्ताधारी युवराजांच्या हट्टामुळे आणि पाठपुराव्यामुळे मजेत जगत होते, हे २५ कोटींच्या खर्चावरून स्पष्ट झाले आहे आणि त्यातून युवराज आणि तत्कालीन सत्ताधार्यांची प्राथमिकता काय होती, हेच स्पष्ट होते.
कायदा सर्वांनाच हवा!
प्रशासकीय संस्था मग ती कुठलीही असो, स्थानिक स्वराज्य/ राज्य सरकार किंवा केंद्र सरकार, जनतेसाठी घेतलेल्या निर्णयांच्या परिणामांची जबाबदारी सत्ताधारी आणि प्रशासक या दोन खांबांवर असते. मग ते परिणाम चांगले असोत किंवा वाईट. मुंबई महापालिकेसारख्या अवाढव्य सत्ताकेंद्राची जबाबदारीदेखील सत्ता पक्ष आणि प्रशासन यांच्यावर आहे.
 
 
 
मात्र, नुकत्याच झालेल्या एका घटनेमुळे पालिका प्रशासन चौकशीच्या पिंजर्यात उभे राहिले आहे. मुंबईत महापालिका क्षेत्रात पडलेल्या खड्ड्यांचा विषय हा तर मुंबईकरांच्या जन्मपत्रिकेत ‘खड्डा योग’ म्हणून जन्माला येतानाच सोबत आला आहे, असा आभास मुंबईत आल्यावर झाल्याशिवाय राहवत नाही. नुकत्याच मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या एका सुनावणीत मुंबईतील खड्ड्यांच्याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी महापालिका प्रशासनातील अधिकार्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयाने दिलेले निर्देश पालन करणे गरजेचे आहे. नव्हे, तर ते प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.
 
 
 
 
न्याय आणि कायदे सर्वांनाच समान असावेत हा साधारण संकेत आहे. रस्ते बांधण्याची, त्याचा दर्जा सांभाळण्याची आणि त्यावर आवश्यक ते नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी जशी स्थानिक प्रशासनाची आहे, तशीच ती स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सत्ताधार्यांचीसुद्धा आहेच. जेव्हा या कामांसाठी प्रक्रिया राबवली जाते, तेव्हा या दोन्ही घटकांचा त्यात महत्त्वाचा सहभाग असतो हे नाकारून चालणार नाही.
 
 
 
 
त्यामुळे जर ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवली गेली असेल किंवा रस्ते बांधणीनंतर त्यात काही त्रुटी राहिल्या असतील, तर त्यासाठी प्रशासनासोबतच सत्ताधारी मंडळींनाही तितकेच जबाबदार धरणे संयुक्तिक ठरेल. मुंबईच्या रस्त्यांवर मागील २५ वर्षांत २१ हजार कोटींचा खर्च झाल्याची कबुली मागच्या वर्षी महापालिकेने दिली होती, त्यात वर्षभरामध्ये निश्चितच हजार कोटींची भर पडली असेल. पाण्यासारखा पैसा खड्ड्यात गेला असला तरी कोडगे सत्ताधारी आणि निर्धास्त प्रशासन धिम्मपणे काम करत असल्याची स्थिती आजही बदललेली नाही. त्यामुळे खड्ड्यांची जबाबदारी केवळ प्रशासनावर न टाकता कायदा आणि न्याय सर्वांना समान ठेवावा अशी अपेक्षा आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.
जरुर वाचा
कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis शेतीसाठी 'एआय' वर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून, कृषी विभागाच्या सर्व योजना एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी ॲप व संकेतस्थळ विकसित करावे. कृषीमधील स्टॉर्टअपला प्रोत्साहन देवून नवकल्पना विकसित करण्यासाठी कृषी विभागाने प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या भेटीत राज्यातील कृषी क्षेत्रात सहकार्य करण्यास ते इच्छुक असल्याचे त्यांनी असल्याचेही असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले...

बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्या पुतण्यावर किरकोळ कारणावरून गोळीबार

बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्या पुतण्यावर किरकोळ कारणावरून गोळीबार

Bihar मधील भगलापूमधून मोठी बातमी समोर आली आहे. बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंतर राय यांच्या पुतण्यावर गोळीबार करत हत्या करण्यात आल्याची दुर्देवी घटना घडली आहे. पाण्यावरून झालेल्या वादातून दोन भावांनी गोळीबार केला असल्याचे सांगण्यात येत असून ज्यात भाऊ जगजीतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दुसरा भाऊ आणि त्याच्या आईलाही गोळ्या लागल्याने जखमी झाल्याचे वृत्त आहे. नवगछियामधील परबट्टा पोलीस ठाणअंतर्गत गजगतपूर गावात ही घटना घडली आहे. मृत आणि जखमी हे नित्यानंद हे चुलत भावाची मुलं आहेत...

महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या, जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी

"महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या", जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी

MLA MT Krishnappa कर्नाटक राज्यातील जनता दलाचे आमदार एमटी कृष्णाप्पा यांनी विधानसभेत बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्या विधानाने ते पुन्हा एकदा नकारात्मक दृष्टीकोन घेऊन प्रकाशझोतात आले आहेत. काही राज्यांमध्ये महिलांना संबंधित राज्य सरकार प्रतिमहा २ हजार तर महाराष्ट्र राज्यात लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून १५०० रुपये दिले जात आहेत. यावरून कर्नाटकातील पुरूषांना का काही नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जर महिलांना पैसे तर पुरूषांनाही मद्य दिले जावे, असे बेताल वक्तव्य एमटी कृष्णाप्पा यांनी केले ..

आता मुंबई, पुणे नाहीतर सांगलीतही बांगलादेशी घुसखोऱ्यांचा वावर, बनावट कागदपत्रांच्या आधारे केली घुसखोरी

आता मुंबई, पुणे नाहीतर सांगलीतही बांगलादेशी घुसखोऱ्यांचा वावर, बनावट कागदपत्रांच्या आधारे केली घुसखोरी

Bangladesh देशात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट सुरू आहे. मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांप्रमाणेच आता छोट्या शहरांमध्ये तर काही निमशहरांमध्ये बांगलादेशी घुसखोरी असल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीमध्ये बनावट कगदपत्र बनवत एका बांगलादेशी घुसखोऱ्याच्या पोलिसांनी त्याची चौकशी केली आहे. चौकशदरम्यान त्याने आपण बांगलादेशातील ढाकातील असल्याचे सांगितले आहे. आपले मूळ नाव अमीर हुसैन असूनही त्याने अमीर शेख या नावाचा वापर करत बनावट कागदपत्रांचा वापर केला...

मेरठनंतर आता जयपूरमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला जाळले

मेरठनंतर आता जयपूरमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला जाळले

Extramarital Affairsठेवणारी काळीज हेलावून टाकणाऱ्या धक्कादायक घटनेनंतर जयपूरमध्ये पती -पत्नीच्या नात्याला काळीमा लावणारी घटना समोर आली आहे. जयपूरमध्ये एका महिलेचे प्रेमसंबंध असलेल्या परपुरूषाला तिच्या पतीचा खून केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर तिने आपल्या पतीचा मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी सांगितले की, भाजी विक्रेता धन्नलाल सैनी याला त्याच्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती मिळाल्यानंतर तिने प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीला जाळलं आहे...