राष्ट्रकुल स्पर्धेतधावपटू हिमा दासचा उपांत्य फेरीत प्रवेश

भारताची बॉक्सिंगमध्ये दमदार कामगिरी

    04-Aug-2022
Total Views | 74
Hima das
 
 
बर्मिंगहॅम : राष्ट्रकुल स्पर्धेत गुरुवारचा दिवस समिश्र ठरला. सर्वांच्या नजराजस्मिनआणि अमित पंघाल या भारतीय खेळाडूंवर होत्या. भारताची स्टार धावपटू हिमा दास २०० मीटर शर्यतीत २३.४२ सेकंदाची वेळ नोंदवून पहिली आली. तिने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अमित पंघालनं बॉक्सिंगमध्ये त्यानं उपांत्य फेरी गाठलीय. अमितनं ४८-५१ किलो गटाच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत स्कॉटलंडच्या लेनन मुलिगनचा पराभव केला.
 
 
धावपटू हिमा दासचा उपांत्य फेरीत प्रवेश
 
महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत अव्वल १६ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरल्या. हिमा हिट २ मध्ये यशस्वी ठरली. हिट १ मध्ये नायजेरियाची फेवर ओफिली २२.७१ सेकंद आणि हीट ५ मध्ये इलेन थॉम्पसन हेर २२.८० सेकंद मध्ये हिमापेक्षा सरस वेळ नोंदवली. हिमाच्या तुलनेत सहा खेळाडूंनी जास्त चांगली वेळ नोंदवली. त्या सेमीफायनल मध्ये पोहोचल्या आहेत. 
 
 
 
 
टेबल टेनिसमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठलीय
टेबल टेनिसमध्ये साथियान आणि मनिका बत्रा या जोडीनं मिश्र दुहेरीत सेशेल्सच्या क्रिया मिक आणि सिनॉन लॉरा या जोडीचा ११-१, ११-३, ७-१ असा पराभव केलाय. या विजयासह भारतीय जोडीनं उपांत्यपूर्व फेरी गाठलीय आहे.
 
 
 
 
बॉक्सिंगमध्ये जास्मिनचंही पदक निश्चित
भारताच्या जस्मिननंही बॉक्सिंगच्या ५७-६० किलो वजनी गटात उपांत्य फेरीत धडक मारली आहे. यासोबतच तिनं भारतासाठी एक पदकही निश्चित केलं आहे. जस्मिननं उपांत्यपूर्व फेरीत न्यूझीलंडच्या टोरी ग्रँटनचा ४-१ असा पराभव केला आहे.
 
 
बॉक्सिंगमध्ये अमित पंघाल दमदार कामगिरी
अमित पंघालनं बॉक्सिंगमध्ये त्यानं उपांत्य फेरी गाठलीय. अमितनं ४८-५१ किलो गटाच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत स्कॉटलंडच्या लेनन मुलिगनचा पराभव केला. अमितनं हा सामना ५-० फरकानं जिंकला. यामुळे भारतासाठी आणखी एक पदक निश्चित झाले आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
पाहलगाम हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले,जग मागतंय सिंदूर... चितेच्या राखेतून!

पाहलगाम हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले,"जग मागतंय सिंदूर... चितेच्या राखेतून!''

भारत आणि पाकिस्तानमधील सीमेवरील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शस्त्रसंधी असूनही पाकिस्तानकडून कुरापती थांबलेल्या नाहीत. शनिवारी रात्री पुन्हा एकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं. अशा परिस्थितीत देशाच्या जवानांची शौर्यगाथा सर्वत्र गौरवली जात आहे. अनेक बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त करत आहेत. मात्र, या सगळ्या पार्श्वभूमीवर 'सदीच्या महानायक' अमिताभ बच्चन यांचं मौन कायम होतं. पाहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि 'ऑपरेशन सिंदूर'नंतरही त्यांनी सोशल मीडियावर काहीही प्रतिक्रिया दिली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121