पुरंदर तालुक्यातील पिंगोरी गावात बिबट्याचा वावर

वनविभागाकडून जन जागृतीचा प्रयत्न

    04-Aug-2022
Total Views | 107
van
 
 
 

मुंबई: पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील पिंगोरी गावात बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आले आहे. पिंगोरी हे गाव पुरंदर तालुक्यात डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे. आजूबाजूला संपूर्ण जंगल परिसर आहे. सोमवारी दि.१ ऑगस्ट रोजी रात्री हा बिबट्या रस्त्यावरुन जाताना गावकऱ्याने पहिला. माणसाला पाहून हा बिबट्या रस्त्यालगत असलेल्या झाडीत जाऊन बसला. आतापर्यंत बिबट्यान कोणावरही हल्ला केलेला नाही.
 
वन विभागाला या बाबतची माहिती मिळताच, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन, लोकांची विचारपूस केली. तसेच, काही अनुचित घडू नये यासाठी, वन विभागाने, लोकांना व्हीडीओ दाखवून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. पिंगोरी हे गाव सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते. मात्र या गावात अजूनही मोबाईलला रेंज नाही. त्यामुळे जरी कोणता आपत्कालीन प्रसंग आला तर मोबाईलला रेंज नसल्याने गावकऱ्यांनी संपर्क कोणाला करायचा, असा प्रश्न निर्माण होतो.
 
फोन असतो पण मोबाईलला रेंज नसल्या कारणाने फोन असून पण उपयोग होत नाही, अशी स्थिती गावकऱ्यांची आहे. गावकऱ्यांनी गावात टॉवर लावावा अशी मागणी केली मात्र प्रशासनाने टॉवरची सोय केली नसल्याचे गावकरी सांगतात. लोकांनी काळजी घ्यावी आणि बिबट्याला डिवचण्याचा पर्यंत करू नये. तसेच बिबट्या विषयक दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे वनविभागाकडून गावकर्यांना सांगण्यात आले आहे. बिबट्या दिसल्यास गावकऱ्यांनी तात्काळ माहिती वनविभागाला द्यावी, असे आवाहन वन परिक्षेत्र अधिकारी विशाल चव्हाण यांनी केले आहे. 
अग्रलेख
जरुर वाचा
हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

Kancha Gachibowli तेलंगणा राज्यातील हैदराबाद विद्यापीठाच्या नजीक असणाऱ्या कांचा गचिबोवली (Kancha Gachibowli) ही ४०० एकर जंगलतोड करण्यात आली. तेलंगणा सरकारने आयटी कंपनी उभारण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र त्यांनी जंगलातील झाडे कापून नैसर्गिक हानी केली आहे. यामुळे संबंथित विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले होते. कांचा गचिबोवली जंगलात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक करणासाठी फायदेशीर जंगल होते. यालाच देशभरातून विविध माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच पद्धतीने आता ..

वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

Waqf Act संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ सुधारित कायदा पारित झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सही करत कायद्याला मंजूरी देत वाट मोकळी केली आहे. याचा देशभरात चांगला प्रतिसाद दिसत आहे. तर काही धर्मांध यांचा गैर अपप्रचार करत आहेत. वक्फ कायदा लागू झाल्यानंतर इतरांच्या मालकी हक्कांवर वक्फ दावा करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. अशातच आता असेच एक प्रकरण समोर आले आहे. ज्यात अवैधपणे जमिनींवर वक्फने दावा केला आणि आता त्याविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बरेलीतील असल्याचे सांगण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121